शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

सवत आणणे हा छळ नव्हे

By admin | Updated: November 6, 2015 01:26 IST

‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई : ‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याच्या खटल्यात तिच्या सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता केली आहे.साधना संजीव कांबळे विवाहितेने जुलै १९९४ मध्ये राधानगर, जुनी सांगवी, पुणे येथे राहणारे तिचे पती संजीव, तेथेच राहणारी नणंद माई उर्फ पल्लवी, एसिक स्टाफ कॉलनी वागळे इस्टेट ठाणे (प.) येथे राहणारी आणखी एक नणंद निर्मला व नणंदांचे पती अनुक्रमे अशोक मोरे आणि अशोक ननावरे यांच्यावर भादंवि कलम ४९८ अ व ३४ अन्वये खटला चालला होता. पिंपरी येथील प्रथम वर्र्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी एप्रिल २००१ मध्ये सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळताना न्या. एस. बी. शुक्रे यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.साधनाने केलेल्या फिर्यादीत इतर आरोपांखेरीज पतीने सवत घरात आणल्याचाही आरोप होता. २६ जून १९९४ रोजी पती संजीव पुण्याच्या राहत्या घरी एका परस्त्रीला सोबत घेऊन आला व त्याने आपले वडील आणि काकांच्या समक्ष ती आपली दुसरी पत्नी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर त्याने आपल्याला घरातून चालते व्हायला सांगून, तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे साधनाचे म्हणणे होते. यावर न्या. शुक्रे म्हणतात की, ‘पतीने दुसऱ्या स्त्रीला सवत म्हणून घरात आणले हे सिद्ध झाले, तरी त्यातून त्याने तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा अर्थ निघतोच असे नाही. भादंवि कलम ४९८ अ अन्वये या गुन्ह्यासाठी विवाहिता आत्महत्येस प्रवृत्त होईल, किंवा स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट करेल किंवा तिच्यावर तशी वेळ येऊ नये, यासाठी तिच्या माहेरच्यांना सासरच्यांची मागणी मान्य करण्यास भाग पडावे, अशा प्रकारचा छळ करणाऱ्याची मानसिकता तशी होती, ही पुराव्याने सिद्ध व्हायला हवे.’ न्या. शुक्रे लिहितात की, ‘पत्नीने मानसिक संतुलन ढळू न देता किंवा आपले स्वत:चे काही बरेवाईट न करता, राजीखुशीने किंवा मनाविरुद्धही सवतीचा स्वीकार केल्याचेही पाहायला मिळते. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीवर हे अवलंबून आहे. स्वत: साधना, तिचे वडील विष्णू वाघमारे व काका मधुकर यांच्या साक्षींंवरून तिचा सवतीसंबंधीचा आरोप नि:संशयपणे सिद्ध होत नाही.’ (विशेष प्रतिनिधी)पैशाचा आरोपही निराधार : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केला व त्यांनी खूपच तगादा लावल्यावर माहेरच्यांनी नाइलाजाने त्यांना पैसे दिले, असाही साधनाचा आरोप होता, परंतु हा आरोपही सप्रमाण सिद्ध होत नसल्याचे नमूद करताना न्यायालयाने म्हटले की, ‘नेमके किती पैसे दिले, यावर साधनाचे वडील आणि भाऊ यांच्या साक्षीत एकवाक्यता नाही. एकाने १५ हजार दिल्याचे तर दुसऱ्याने १३ हजार दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर एकाने हे पैसे बँकेतून तर दुसऱ्याने सोसायटीतून काढून दिल्याचे सांगितले.’