शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सवत आणणे हा छळ नव्हे

By admin | Updated: November 6, 2015 01:26 IST

‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई : ‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याच्या खटल्यात तिच्या सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता केली आहे.साधना संजीव कांबळे विवाहितेने जुलै १९९४ मध्ये राधानगर, जुनी सांगवी, पुणे येथे राहणारे तिचे पती संजीव, तेथेच राहणारी नणंद माई उर्फ पल्लवी, एसिक स्टाफ कॉलनी वागळे इस्टेट ठाणे (प.) येथे राहणारी आणखी एक नणंद निर्मला व नणंदांचे पती अनुक्रमे अशोक मोरे आणि अशोक ननावरे यांच्यावर भादंवि कलम ४९८ अ व ३४ अन्वये खटला चालला होता. पिंपरी येथील प्रथम वर्र्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी एप्रिल २००१ मध्ये सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळताना न्या. एस. बी. शुक्रे यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.साधनाने केलेल्या फिर्यादीत इतर आरोपांखेरीज पतीने सवत घरात आणल्याचाही आरोप होता. २६ जून १९९४ रोजी पती संजीव पुण्याच्या राहत्या घरी एका परस्त्रीला सोबत घेऊन आला व त्याने आपले वडील आणि काकांच्या समक्ष ती आपली दुसरी पत्नी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर त्याने आपल्याला घरातून चालते व्हायला सांगून, तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे साधनाचे म्हणणे होते. यावर न्या. शुक्रे म्हणतात की, ‘पतीने दुसऱ्या स्त्रीला सवत म्हणून घरात आणले हे सिद्ध झाले, तरी त्यातून त्याने तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा अर्थ निघतोच असे नाही. भादंवि कलम ४९८ अ अन्वये या गुन्ह्यासाठी विवाहिता आत्महत्येस प्रवृत्त होईल, किंवा स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट करेल किंवा तिच्यावर तशी वेळ येऊ नये, यासाठी तिच्या माहेरच्यांना सासरच्यांची मागणी मान्य करण्यास भाग पडावे, अशा प्रकारचा छळ करणाऱ्याची मानसिकता तशी होती, ही पुराव्याने सिद्ध व्हायला हवे.’ न्या. शुक्रे लिहितात की, ‘पत्नीने मानसिक संतुलन ढळू न देता किंवा आपले स्वत:चे काही बरेवाईट न करता, राजीखुशीने किंवा मनाविरुद्धही सवतीचा स्वीकार केल्याचेही पाहायला मिळते. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीवर हे अवलंबून आहे. स्वत: साधना, तिचे वडील विष्णू वाघमारे व काका मधुकर यांच्या साक्षींंवरून तिचा सवतीसंबंधीचा आरोप नि:संशयपणे सिद्ध होत नाही.’ (विशेष प्रतिनिधी)पैशाचा आरोपही निराधार : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केला व त्यांनी खूपच तगादा लावल्यावर माहेरच्यांनी नाइलाजाने त्यांना पैसे दिले, असाही साधनाचा आरोप होता, परंतु हा आरोपही सप्रमाण सिद्ध होत नसल्याचे नमूद करताना न्यायालयाने म्हटले की, ‘नेमके किती पैसे दिले, यावर साधनाचे वडील आणि भाऊ यांच्या साक्षीत एकवाक्यता नाही. एकाने १५ हजार दिल्याचे तर दुसऱ्याने १३ हजार दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर एकाने हे पैसे बँकेतून तर दुसऱ्याने सोसायटीतून काढून दिल्याचे सांगितले.’