शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गोवर, रुबेलाची सक्ती नाही, पण लस घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:56 IST

आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; लस घेतल्यानंतर भोवळ आल्यास घाबरून जाऊ नका

मुंबई : गोवर, रुबेला लसीची सक्ती नसली तरी ती घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही बाधा होत नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले.

लसीकरणाचा कार्यक्रम राज्याच्या शाळांत राबविला जात आहे. ही लस दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याने पालक घाबरले. त्यावर डॉ. सावंत म्हणाले की, १४९ देशांत लसीकरणाची मोहीम राबविली गेली आहे. आपल्या २० राज्यांत लसीकरण झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने ही बनवली असून ती सुरक्षित आहे. पोलिओच्या डोसमुळे काही मुलांना जसा ताप येतो, तसे या लसीमुळे काही मुलांना तात्पुरती भोवळ येते, पण त्यामुळे घाबरू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

का आवश्यक?गोवर, रुबेला हे आजार सात ते आठ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतरही आजारी मुलास न्युमोनिया, मेंदुज्वर, अंधत्व तथा मेंदूचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, गर्भपात होणे किंवा मुलास जन्मत:च अपंगत्व येणे वा ते गतिमंद, कुपोषित असणे हे प्रकार होतात. त्यामुळेच लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.गोंदिया, बुलडाण्यात काही विद्यार्थ्यांना बाधागोवर-रुबेला लस दिल्यानंतर गोंदिया येथील स्टार इंटरनॅशनल शाळेतील ६ विद्यार्थ्यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर बुलडाणा जिल्ह्यात ४ दिवसांत २१ जणांना किरकोळ रिअ‍ॅक्शन आली, तरी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.