शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

गोवर, रुबेलाची सक्ती नाही, पण लस घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:56 IST

आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; लस घेतल्यानंतर भोवळ आल्यास घाबरून जाऊ नका

मुंबई : गोवर, रुबेला लसीची सक्ती नसली तरी ती घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही बाधा होत नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले.

लसीकरणाचा कार्यक्रम राज्याच्या शाळांत राबविला जात आहे. ही लस दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याने पालक घाबरले. त्यावर डॉ. सावंत म्हणाले की, १४९ देशांत लसीकरणाची मोहीम राबविली गेली आहे. आपल्या २० राज्यांत लसीकरण झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने ही बनवली असून ती सुरक्षित आहे. पोलिओच्या डोसमुळे काही मुलांना जसा ताप येतो, तसे या लसीमुळे काही मुलांना तात्पुरती भोवळ येते, पण त्यामुळे घाबरू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

का आवश्यक?गोवर, रुबेला हे आजार सात ते आठ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतरही आजारी मुलास न्युमोनिया, मेंदुज्वर, अंधत्व तथा मेंदूचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, गर्भपात होणे किंवा मुलास जन्मत:च अपंगत्व येणे वा ते गतिमंद, कुपोषित असणे हे प्रकार होतात. त्यामुळेच लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.गोंदिया, बुलडाण्यात काही विद्यार्थ्यांना बाधागोवर-रुबेला लस दिल्यानंतर गोंदिया येथील स्टार इंटरनॅशनल शाळेतील ६ विद्यार्थ्यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर बुलडाणा जिल्ह्यात ४ दिवसांत २१ जणांना किरकोळ रिअ‍ॅक्शन आली, तरी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.