शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयटीचे जाळे राज्यभर विणावे

By admin | Updated: April 6, 2016 05:00 IST

आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे,

नवी मुंबई : आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. राज्यात तरुणांची संख्या अधिक असून, आयटी क्षेत्रात त्यांच्या बुद्धीचा वापर करून घेतल्यास महाराष्ट्राची छाप जगात पडेल, असा विश्वास त्यांनी ऐरोलीत व्यक्त केला.येथील खासगी नॉलेज पार्कचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्यासह कंपनीचे संचालक पॉल हर्मलीन व इतर मान्यवर उपस्थित होते. आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात आयटी धोरण अधिक सक्षम केले जात आहे. नव्याने राबवल्या जाणाऱ्या या धोरणात आयटी कंपन्यांना अधिकाधिक सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे व्यक्त केली. सध्या मुंबई, नवी मुंबई अशा ठरावीक शहरांमध्येच आयटी कंपन्या आपला जम बसवत आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण शहरी भागांकडे धाव घेत आहेत. शिवाय काही ठरावीक शहरांचीच विशेष ओळख तयार होत आहे. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न करावेत. त्याकरिता नागपूर व सांगलीसारख्या शहरांचाही विचार व्हावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवले. लोकसंख्येत तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे तरुण बुद्धीच्या बळावर राज्याला तंत्रज्ञानात पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)