शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बाजेवर बसून करावी लागते नदी पार !

By admin | Updated: July 12, 2016 21:05 IST

शेजारच्या गावाला जायचे असेल, जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदी पार करून जाण्याशिवाय ग्रामस्थांना कोणताही पर्याय उरत नाही.

प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 12 - काम कोणतेही असो, शेजारच्या गावाला जायचे असेल, जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदी पार करून जाण्याशिवाय ग्रामस्थांना कोणताही पर्याय उरत नाही. जीव धोक्यात घालून असा पाण्यातील जीवघेणा प्रवास गेली अनेक वर्षांपासून आष्टी तालुक्यातील धनगरवाडीचे ग्रामस्थ करत आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा खेड्यात कसल्याच सुविधा नाहीत. त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही या गावातील लोकांना सहा किलोमिटरवर असलेल्या डोईठाण गावावर अवलंबून रहावे लागते. शाळा असो की रूग्णावर उपचार करायचा असो, डोईठाणलाच यावे लागते. धनगरवाडीहून डोईठाणला जाण्यासाठी कसलाच रस्ता नसल्याने दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या धनरवाडी नदीतूनच मग प्रवास करणे अपरिहार्य ठरते. वयोवृध्द लोकांना किंवा महिलांना ही नदी ओलांडण्यासाठी या गावातील लोकांनी शक्कल लढविली आणि एक बाजच येथे कायमस्वरूपी ठेवण्यात आली. त्यांना बाजेवर बसावयचे आणि गावातील लोकांनी एका बाजूकडून दुसरीकडे घेऊन जायचे, असा नित्याचा दिनक्रमच ठरून गेला आहे. शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांनाही बाजेवर बसवूनच नदी पार करावी लागते.रस्त्याची मागणी करून येथील ग्रामस्थ थकले आहेत. उपोषणे झाली, रस्ता रोको झाले, नेत्यांना विनवण्या करून झाल्या. परंतु त्यांचा रस्त्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागताना दिसत नाही.