शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

..हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही - राज ठाकरेंनी ठणकावले

By admin | Updated: September 10, 2015 18:12 IST

महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे. पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी असेल तर गणपती, श्रावण व नवरात्रौत्सव दरम्यानही मांसविक्रीवर बंदी घालणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

मांसविक्री बंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा येथे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मांसविक्री बंदीवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मांसविक्री बंद होणार नाही, २ - ४ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी का घालायची, विक्रेत्यांनी अशी कोणतीही बंदी पाळू नये, या सर्व विक्रेत्यांना मनसे संरक्षण देईल अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ग लोकांना चांगले रस्ते, सुरक्षा, पाणी, शिक्षण, रोजगार हवा आहे, पण दुर्दैवाने सत्ताधारी भाजपाला या मुद्द्यांपेक्षा भलत्याच मुद्द्यांमध्ये रस आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली. या वादाला जैन विरुद्ध हिंदू असा रंग देण्याचा प्रयत्न आहे, भाजपानेच हे सर्व पेरलंय व यातून भाजपालाच राजकीय लाभ मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.  नाशिक महापालिका क्षेत्रात मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आयआरबी हा राजकीय पक्षांना फंड पुरवाणारी कंपनी आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. सरकारविरोधी बोलण हा देशद्रोह ठरुच शकत नाही, लोकशाहीत अशा गोष्टी चालणारही नाहीत, प्रत्येक गोष्टीवर निर्बंध घातले जात आहेत, देशात व राज्यात मोगलाई आली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  भाजपा हा भारतीय जंत पक्ष आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. राकेश मारियांसारख्या तडफदार अधिका-याला तडकाफडकी हटवण्याची गरज नव्हती असेही त्यांनी नमूद केले.