शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

जनतेचे हित हेच सरकार आणि पत्रकारितेचे लक्ष्य

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

एका विचारवंताच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पत्रकार हे सहयोगी नसून प्रतिस्पर्धी आहेत. पण, तरीही जनतेचे हित साधणे हे दोघांचेही उद्दिष्ट असते. लोकप्रतिनिधींना राज्यकारभार करण्याचा अधिकार आहे,

मा. गो. वैद्य : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार नागपूर : एका विचारवंताच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पत्रकार हे सहयोगी नसून प्रतिस्पर्धी आहेत. पण, तरीही जनतेचे हित साधणे हे दोघांचेही उद्दिष्ट असते. लोकप्रतिनिधींना राज्यकारभार करण्याचा अधिकार आहे, ही बाब पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवी. त्याचवेळी, सरकारचा राज्यकारभार कसा चाललाय याबाबत भाष्य करण्याचा अधिकार पत्रकारांचा आहे, हे राज्यकर्त्यांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजाचे हित साधणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, हे दोन्ही घटकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, भाष्यकार व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केले. विधिमंडळाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे ज्येष्ठ संपादक व विचारवंत मा.गो. वैद्य यांचा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळाच्या सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा.गो. वैद्य यांच्या पत्नी सुनंदा वैद्य, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री मेघनाद बोधनकर, लक्ष्मणराव शास्त्री, टी.बी. गोल्हर, राजाभाऊ पोफळी, उमेश चौबे, ए.पी. अंधारे, प्रकाश दुबे, जगन वंजारी, प्रदीप मैत्र, बबनराव नाखले यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा.गो. वैद्य म्हणाले, मी हाडाचा पत्रकार नाही. अपघाताने पत्रकार झालो. वयाच्या ४१ व्या वर्षी आपला व्यवसाय सोडून मी पत्रकारितेत आलो. मी परखडपणे लिहिले परंतु कधी कुणाला शिव्या दिल्या नाहीत. पत्रकाराला शब्दांचे अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. भूतकाळाचा मागोवा घेत वर्तमानकाळातील परिस्थिती लक्षात घेऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. यावेळी नागेश केसरी यांनी आपला पेन भेट देऊन वैद्य यांना सातत्याने लिहीत राहण्याची विनंती केली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांनीही मा.गो. वैद्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी आमदार कपील पाटील, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी संचालन व आभार मानले. (प्रतिनिधी)मा.गो. वैद्य यांचे विचार सर्वांसाठी पथदर्शी ज्येष्ठ संपादक भाष्यकार आणि विचारवंत मा.गो. वैद्य यांनी उत्तम शिक्षक, उत्तम पत्रकार, उत्तम आमदार आणि उत्तम संघटक अशी चौफेर भूमिका निभावून समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे ज्ञान आणि त्यांचे विचार आपणा सर्वांसाठी पथदर्शी आहेत, असे गौरवोदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.