शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

आसाममधील विजयाचा संघाने रचला पाया

By admin | Updated: May 19, 2016 22:19 IST

लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांत संघ स्वयंसेवकांनी सक्रिय प्रचार केला नसला तरी विजयाचा खरा पाया त्यांनीच रचला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले

योगेश पांडे

नागपूर : आसाममध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांत संघ स्वयंसेवकांनी सक्रिय प्रचार केला नसला तरी विजयाचा खरा पाया त्यांनीच रचला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले असून तळागाळापर्यंत तेथील स्वयंसेवक व प्रचारक पोहोचत आहेत. खडतर परिस्थितीत संघ प्रचारकांनी दुर्गम क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती भाजपाला या विजयाच्या रूपात मिळाली. आसाममध्ये संघाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरच संघाने पूर्वोत्तर राज्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. या भागात वाढणारे धर्मांतरण, सीमेवरून होणारी घुसखोरी, शिक्षणाचा अभाव इत्यादी मुद्यांवर संघाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली व यासंदर्भात विविध उपक्रमदेखील राबविले. या मुद्यांवर संघ प्रचारकांनी अगदी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. या कामात अडचणी येत असल्याने येथे सत्ता यावी, अशी संघ धुरिणांची इच्छा होती.

त्यामुळेच येथील शाखाविस्तारावरदेखील भर देण्यात आला होता. शिक्षणावर दिला भर विद्यार्थी व तरुणांच्या समस्यांवरदेखील संघ पदाधिकारी सातत्याने काम करत होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एकल विद्यालयांचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये ३०० हून अधिक एकल विद्यालय चालत आहेत. याशिवाय हिंसाग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांवर देशात निरनिराळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्यावेळी संघाने त्यांना मदतीचा हात दिला होता. नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास गेल्या काही कालावधीत आसाममधील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर संघ प्रचारकांनी भर दिला होता. दोन वर्षेंअगोदर आसाममध्ये भडकलेली जातीय हिंसा असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येकवेळी संघ स्वयंसेवक स्थानिक नागरिकांसोबत उभे राहिले व मदतीचा हात दिला.

सेवा भारती तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आसाममध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आदिवासी, दुर्लक्षित नागरिकांसाठी विविध योजनादेखील सुरू आहेत. सीमाभागातदेखील संघाने कामावर भर दिला व सुनील देशपांडे यांनी तर आसाम अक्षरश: पिंजून काढले. भाजपाच्या प्रचाराची जबाबदारीदेखील संघाचे माजी प्रवक्ते राम माधव यांच्याकडेच देण्यात आली. याचाच फायदा विधानसभा निवडणुकांमध्ये झाला अन् भाजपाला ऐतिहासिक यश मिळाले. राष्ट्रीय शक्तींना जनतेचे समर्थन आसाममधील या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय विचारसरणीच्या शक्तींना जनतेने दिलेले हे समर्थन आहे. संघाचे या भागात फार अगोदरपासून विधायक कार्य सुरू आहे. कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून काम करण्यात येत नाही. विचार असतो तो फक्त देशाचा. अतिशय विपरीत परिस्थितीत येथे कामाला सुरुवात केली होती. या विजयामुळे येथील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला आहे. -डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ