शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

स्वत:ला शहरी नक्षलवादी म्हणणे ही अतिशयोक्तीच - अभिराम भडकमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:54 IST

अनुभवातून हा विचार आला का, हेही पाहावे । गज्वी यांच्या भाषणावर उलटसुलट चर्चा

- अजय परचुरे 

नागपूर : माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त वातावरण नाही. नाट्य संमेलनातील अध्यक्षीय पदावरून गज्वींनी स्वत:ला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल, असा प्रश्न विचारणं म्हणजे ही अतिशयोक्ती आहे, अशी टीका लेखक व नाटककार अभिराम भडकमकर यांनी केली.

लेखकांना लिहिण्याचं आज तरी स्वातंत्र्य आहे. लेखकाची सरसकट धरपकड होतेय, असं चित्र अजूनतरी मला दिसलेलं नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गज्वींनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

मला प्रेमानंद गज्वी यांचं संपूर्ण भाषण आवडलं. शहरी नक्षलवादाबद्दल त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि लेखक म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि त्यामुळे त्यांनी मांडलेले विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे, असे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले.

पण ते म्हणतात तसा अनुभवन कलाकार म्हणून मला अजून कधी आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत लिमये म्हणाले की, गज्वींचे विचार नाकारण्यासारखे नाहीत. त्यांनी आतापर्यंत केलेलं प्रामुख्याने संशोधनात्मक आहे. त्यांनी करमणुकीचं लिखाण केलंलं नाही. त्यांचा विचार एका प्रकारे विद्रोही आहे.

असं वातावरण घाशीराम कोतवाल, सखाराम बार्इंडर नाटकांच्या वेळीही होतं. लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, त्याला नेमकं काय मांडायचं आहे हे न समजता विरोध यापूर्वीही झाला. गज्वींनी अनुभवातून हा विचार मांडला का? हे तपासण्याची गरज आहे.नाटककार शफाअत खान म्हणाले की, प्रश्न विचारायचा नाही, वाटलं तरी लिहायचं नाही याचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं आहे वा तसा दबाव वरूनच आलाय असं नव्हे. सध्या रस्त्यावरील माणसालाही काही पटले नाही तर कायदा हातात घेतला जातो. ही परिस्थिती आधी नव्हती. ती आपली संस्कृती नव्हती. समाज गोठलेल्या मन:स्थितीत आहे. जोपर्यंत विचारांचं, लिखाणाचं, वागण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत समाजाचं हे गोठलेपण काही केल्या कमी होणार नाही.संमेलनाध्यक्षांची वारीप्रेमानंद गज्वींसह आतापर्यंतच्या ९९ नाट्य संमेलनाध्यक्षांचा आढावा घेणारा कार्यक्रम रविवारी होणार आहे. यात नागपुरातील २०० कलाकार सहभागी होणार आहेत.

कुछ भी ‘सही’ नहींनागपूरच्या नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाला आलेल्या कलाकारांची फरफट केली. याचा मोठा फटका बसला मराठी सुपरस्टार भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ नाटकाच्या कलाकारांना. नागपुरात आल्यावर या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी वणवण करावी लागली. एवढेच नव्हे, तर सुरेश भट नाट्यगृहात आल्यावर त्यांना चहा व नाश्ताही मिळाला नाही. त्यामुळे भरत जाधव व सारेच कलाकार चिडले होते.