शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

स्वत:ला शहरी नक्षलवादी म्हणणे ही अतिशयोक्तीच - अभिराम भडकमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:54 IST

अनुभवातून हा विचार आला का, हेही पाहावे । गज्वी यांच्या भाषणावर उलटसुलट चर्चा

- अजय परचुरे 

नागपूर : माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त वातावरण नाही. नाट्य संमेलनातील अध्यक्षीय पदावरून गज्वींनी स्वत:ला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल, असा प्रश्न विचारणं म्हणजे ही अतिशयोक्ती आहे, अशी टीका लेखक व नाटककार अभिराम भडकमकर यांनी केली.

लेखकांना लिहिण्याचं आज तरी स्वातंत्र्य आहे. लेखकाची सरसकट धरपकड होतेय, असं चित्र अजूनतरी मला दिसलेलं नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गज्वींनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

मला प्रेमानंद गज्वी यांचं संपूर्ण भाषण आवडलं. शहरी नक्षलवादाबद्दल त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि लेखक म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि त्यामुळे त्यांनी मांडलेले विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे, असे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले.

पण ते म्हणतात तसा अनुभवन कलाकार म्हणून मला अजून कधी आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत लिमये म्हणाले की, गज्वींचे विचार नाकारण्यासारखे नाहीत. त्यांनी आतापर्यंत केलेलं प्रामुख्याने संशोधनात्मक आहे. त्यांनी करमणुकीचं लिखाण केलंलं नाही. त्यांचा विचार एका प्रकारे विद्रोही आहे.

असं वातावरण घाशीराम कोतवाल, सखाराम बार्इंडर नाटकांच्या वेळीही होतं. लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, त्याला नेमकं काय मांडायचं आहे हे न समजता विरोध यापूर्वीही झाला. गज्वींनी अनुभवातून हा विचार मांडला का? हे तपासण्याची गरज आहे.नाटककार शफाअत खान म्हणाले की, प्रश्न विचारायचा नाही, वाटलं तरी लिहायचं नाही याचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं आहे वा तसा दबाव वरूनच आलाय असं नव्हे. सध्या रस्त्यावरील माणसालाही काही पटले नाही तर कायदा हातात घेतला जातो. ही परिस्थिती आधी नव्हती. ती आपली संस्कृती नव्हती. समाज गोठलेल्या मन:स्थितीत आहे. जोपर्यंत विचारांचं, लिखाणाचं, वागण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत समाजाचं हे गोठलेपण काही केल्या कमी होणार नाही.संमेलनाध्यक्षांची वारीप्रेमानंद गज्वींसह आतापर्यंतच्या ९९ नाट्य संमेलनाध्यक्षांचा आढावा घेणारा कार्यक्रम रविवारी होणार आहे. यात नागपुरातील २०० कलाकार सहभागी होणार आहेत.

कुछ भी ‘सही’ नहींनागपूरच्या नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाला आलेल्या कलाकारांची फरफट केली. याचा मोठा फटका बसला मराठी सुपरस्टार भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ नाटकाच्या कलाकारांना. नागपुरात आल्यावर या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी वणवण करावी लागली. एवढेच नव्हे, तर सुरेश भट नाट्यगृहात आल्यावर त्यांना चहा व नाश्ताही मिळाला नाही. त्यामुळे भरत जाधव व सारेच कलाकार चिडले होते.