शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘मेहनत करून जगणे गुन्हा आहे?’

By admin | Updated: July 9, 2015 03:09 IST

मेहनत करून जगणे गुन्हा आहे का असा सवाल विचारत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत:ची कैफियत मांडली

मुंबई : मेहनत करून जगणे गुन्हा आहे का असा सवाल विचारत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत:ची कैफियत मांडली. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील शासनाने भाडेतत्त्वावर करार पद्धतीने दिलेल्या भूखंडावर गायकवाड यांचे हॉटेल आहे; मात्र माफियांच्या घशात घालण्यासाठी करार वाढवला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गायकवाड म्हणाले, की ११९४ साली शासनाने उदरनिर्वाहासाठी दिलेल्या भूखंडावर त्यांनी स्वखर्चाने हॉटेल उभारले होते. त्यासाठी लातूर येथील घर आणि जमीनही विकली. या ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये चित्रनगरीतील कर्मचाऱ्यांना २५ टक्के सवलतीच्या दरात जेवण देत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या बदल्यात शासनाकडून कोणतेही अनुदान घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता शासन तो भूखंड काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भूखंडाचा करार २०११ साली संपला असला तरीही जून २०१५ पर्यंतचे पाणी आणि जागेचे भाडे भरल्याचे पुरावेही त्यांनी या वेळी दाखवले. यावर प्रशासनातर्फे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशानुसारच हॉटेल खाली करीत असल्याचे सांगितले. गायकवाड यांच्याकडून करार संपल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने भाडे स्वीकारले का, याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू असेही सांगितले.