शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

पाणी वाटपावरून राष्ट्रवादीतच वाद

By admin | Updated: December 16, 2015 03:04 IST

मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही

नागपूर : मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही वेळ बाजूला राहिली व मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्राच्या आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले.राज्यातील दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधान परिषदेत मंगळवारी सकाळी चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे जयंत पाटील हे आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणी वाटपाचा मुद्दा काढला. राज्यात समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव आक्रमक झाले. दुष्काळ काय मराठवाड्यातच आहे का? उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या आहे. आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला का द्यायचे. मराठवाड्यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते, असे ते म्हणाले. यावर राष्ट्रवादीचेच अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी विरोध केला. मराठवाड्यात प्यायला पाणी नाही, तेथे सिंचनासाठी काय वापरणार असे म्हणत दोघेही आक्रमक झाले. (प्रतिनिधी)