शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’चे मुख्य केंद्र महाराष्ट्र ?

By admin | Updated: January 24, 2016 02:49 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या इसिसने आखलेल्या कटाचा पर्दाफाश करत एनआयएने शुक्रवारी सुरू केलेले अटकसत्र शनिवारीही

मुंबई/नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या इसिसने आखलेल्या कटाचा पर्दाफाश करत एनआयएने शुक्रवारी सुरू केलेले अटकसत्र शनिवारीही सुरूच राहिले. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या इम्रान मोअज्जम खान या २६ वर्षांच्या युवकाच्या अटकेने राज्यात पकडलेल्यांची संख्या ३ झाली आहे. ‘इसिस’च्या जाळ्याचे महाराष्ट्र मुख्य केंद्र असावे, असा एनआयएचा होरा आहे. शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या १३ जणांना अटक करून दिल्लीला नेण्यात आले.एटीएसच्या मदतीने एनआयएने शुक्रवारी मुंब्रा येथून मुदब्बीर शेखला अटक केली होती. तो ‘इसिस’च्या चमूचा अमीर अर्थात प्रमुख होता. तर वैजापूर येथे अटक झालेला इम्रान हा सेकंड-इन-कमांड होता. इम्रान कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर असून, गेल्या दोन वर्षांपासून तो अंधेरीच्या खाजगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो मुंब्रा येथे राहत असे. आॅक्टोबर २०१५मध्ये त्याने वैजापूर येथे कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम सुरू केले होते. इम्रान हा दोन वर्षांपासून मुदब्बीर शेखच्या संपर्कात होता, अशी माहितीही समोर आली आहे. (विशेष प्रतिनिधी)हे अडकले जाळ्यात सय्यद मुजाहीद (३३, तुमकूर, कर्नाटक), असिफ अली उर्फ अरमान सानी (२१), सुहेल अहमद उर्फ सोहेल उर्फ हफिस साब (२३) व मोहम्मद अब्दुल अहाद उर्फ बडे अमीर उर्फ सुलेमान (४६) (तिघेही बेंगळुरू), मोहम्मद अलीम (२०, लखनौ), मोहम्मद ओबेदुल्ला खान उर्फ ओबीद उर्फ तलहा (३३) व अबू अनास (२४) (दोघेही हैदराबाद) आणि मोहम्मद हुसेन खान उर्फ जमील (३६, माझगाव, मुंबई)‘साब, मुझसे गलती हो गई!’याच कारवाईत शुक्रवारी मुंबईत माझगाव येथे अटक केलेल्या खान मोहम्मद हुसैन यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता, ‘साब, मुझसे गलती हो गई!’ अशी कबुली त्याने न्यायाधीशांपुढे दिली. त्याच्या वकिलांनी मात्र पोलिसांच्या दबावाखाली हे कथन केल्याचा आरोप केला.अनेक दिवसांपासून होती पाळतगृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, तुमकूर, मंगलोर, हैदराबाद, मुंबई व लखनौ शहरातील १२ ठिकाणांवर शुक्रवारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ‘एनआयए’ने एकाच वेळी छापे टाकून १४ जणांना पकडले होते. त्यापैैकी १३ जणांना अटक करण्यात आली. छाप्यात स्फोट घडवून आणणारे सर्किट्स जप्त करण्यात आले. ‘एनआयए’ने सांगितले की, छाप्यादरम्यान मोबाइल फोन्स, लॅपटॉप, बेहिशेबी पैसा, जिहादी साहित्य व व्हिडीओ तसेच बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे विशिष्ट साहित्य जप्त केले. ‘एनआयए’ने सांगितले की, अटक केलेल्या सर्वांवर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. प्रजासत्ताक दिनी देशभरात हल्ले करण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना अटक केली. अटक केलेल्या सर्वांचा संबंधित न्यायालयांकडून प्रवासाचा रिमांड घेऊन नंतर दिल्लीत आणले जात आहे, असे ‘एनआयए’ने सांगितले.शस्त्रे मिळवून प्रशिक्षण देण्याची योजना उधळलीस्फोटके बनविण्यासाठी तसेच शस्त्रे मिळविण्यासाठी चॅनेल निर्माण करण्याची योजना आखणे, शस्त्रास्त्रे प्रशिक्षणासह इतर प्रशिक्षण देण्यासाठी ठिकाणे शोधणे, पोलीस अधिकारी व परदेशी नागरिकांवर हल्ले करण्यासाठी नवीन समर्थकांना उद्युक्त करणे, देशात दहशतवादी कारवाया करणे आदी कृत्ये हे संशयित करीत होते, असे ‘एनआयए’ने सांगितले.विविध शहरांतील काही विशिष्ट व्यक्ती दहशतवादी कृत्ये करण्यासाठी स्वत:ला तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. अटक केलेले सर्व जण ‘जानूद-उल-खलिफा-ए-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा भाग आहेत. या संघटनेची विचारसरणी इसिससारखीच आहे, असे सूत्रांनी सांगितले. या गटाला हवालामार्फत पैसा मिळत होता, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. तसेच शेखला ६ लाख रुपये मिळाले होते, असेही त्यांनी सांगितले. तपासात हे इसिससारख्या विचारसरणीच्या गटात काम करीत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना चौकशीसाठी नवी दिल्लीत आणले आहे.