शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

पैशासाठी इसिसची बॉॅलिवूडवर नजर?

By admin | Updated: May 16, 2016 02:13 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही दिवसांपूर्वीच इसिसच्या एका कटाचा पर्दाफाश केला

डिप्पी वांकाणी,

मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही दिवसांपूर्वीच इसिसच्या एका कटाचा पर्दाफाश केला होता. दरम्यान, पकडण्यात आलेल्या काही संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार यातीलच एका गटाचा उपप्रमुख असलेल्या रिझवान अहमद (२०) याने या चौकशीत सांगितले की, प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल आणि मोहन भागवत यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता. त्यानंतर कर्नाटकातील वीरप्पन लपत होता त्या जंगलात पळून जाण्याचे आदेश होते. तथापि, भारताविरुद्धच्या कारवायांसाठी बॉलीवूडमधून पैसा जमा करण्याचे आदेशही म्होरक्यांकडून या टोळीतील सदस्यांना देण्यात येत होते, अशी माहिती समोर येत आहे.इसिसचे जे प्रमुख २० सदस्य होते त्यातील रिझवान हा दोन नंबरचा प्रमुख होता. यातील बहुतांश जणांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. रिझवान हा मुंब्रा येथील मुदब्बीर शेख यास रिपोर्टिंग करीत होता. मुदब्बीर हा ‘आमीर’ (प्रमुख) म्हणूनही ओळखला जातो. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून सुरू झालेला आपला प्रवास रिझवानने कथन केला आहे. बारावीत ६७ टक्के गुण घेणारा रिझवान नंतर या दुनियेत सक्रिय झाला. हवालामार्गे सुरुवातीला पैसा मिळाला. नंतर त्याला असे सांगण्यात आले की, बॉलीवूडमधील प्रतिष्ठितांना लक्ष्य करून पैसा जमा करावा. स्वत:ला आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी आणि कामाच्या विस्तारासाठी चोऱ्या करण्याचेही त्याला सांगण्यात आले होते. चौकशीदरम्यान रिझवानने सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून तो सफी अम्मार ऊर्फ युसूफच्या संपर्कात आला होता. हाच युसूफ ‘अन्सार- ए- तौहीद’चा प्रमुख आहे. त्यांचे इसिसला समर्थन आहे. युसूफने रिझवानला सांगितले होते की, अल कायदा आणि तालिबान यांनी त्यांना निधी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर जगात खिलाफतची स्थापना करण्यासाठी इसिसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. >मुदब्बीर शेख : मतभेद असूनही प्रमुखपदीमुदब्बीर शेख याची इसिसचा देशातील आमीर (प्रमुख) म्हणून घोषणा झाली होती, तर अन्य चार जणांत डेप्युटी कमांडर, संपर्कप्रमुख, आॅपरेशनप्रमुख आणि अर्थप्रमुख, अशी जबाबदारी लखनौ येथील बैठकीत देण्यात आली. मुदब्बीरला आमीर (प्रमुख) घोषित करण्याबाबत मतभेद होते; पण इसिसचा प्रमुख अबू-बक्र-अल-बगदादी याने हा निर्णय घेतला होता.गोव्यातील अपार्टमेंट सोडू नका, असे युसूफने रिझवानला सांगितले होेते; पण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी मालवणी तरुण घर सोडून पळाले ही बातमी टीव्हीवर पाहताच रिझवान घर सोडून पळाला.हत्यारांची खरेदी आणि जंगलात लपण्यासाठी छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांची मदत घेण्याचे ठरले होते; पण पोलिसांच्या भीतीमुळे ही योजना बदलली आणि कर्नाटकाच्या जंगलात आश्रय घेण्याचे ठरले. ज्या भागात वीरप्पन राहत होता. रिझवान हा पनवेलमध्ये एका मित्रासह दोन महिने थांबला होता. कुशीनगरचा त्याचा हा मित्र येथे एका बांधकाम कंपनीत काम करीत होता. रिझवानने त्याला सांगितले होते की, आपण मुंबईत कपड्याचा व्यवसाय सुरू करू इच्छितो. रिझवानने त्याच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागांत त्याने टोळीच्या सदस्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.