शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By admin | Updated: July 18, 2016 04:39 IST

जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत.

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्के इतकाच जलसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. शेकडो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अजूनही अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जुनअखेरीस मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली होती. विभागातील पाणीसाठा अर्ध्या टक्क्यांवर आला होता. जुलैच्या सुरूवातीला सर्वदूर दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. परंतु अजूनही विभागातील धरणे रिकामीच आहेत. १५ जुलैच्या अखेरीस धरणांमध्ये अवघा साडेचार टक्के इतकाच पाणी साठा होऊ शकला आहे. (प्रतिनिधी)>८ प्रकल्पात मृतसाठा मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२१ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीसह आठ मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. केवळ तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १६४ दलघमीचा साठा होऊ शकला आहे. त्यामध्ये निम्न दूधना, विष्णुपुरी आणि पेनगंगा धरणाचा समावेश आहे. ‘गोदावरी’चे बंधारेही कोरडेठाकगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर जायकवाडीपासून नांदेडपर्यंत ११ बंधारे बांधले. त्यांची क्षमता २३१ दलघमीची आहे. मात्र हे बंधारेही अद्याप कोरडेच आहेत. मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आले आहे. या १८ बंधाऱ्यांमध्ये आतापर्यंत केवळ ३ दलघमी म्हणजे ३.५ टक्केच पाणीसाठा होऊ शकला.पाणीपुरवठा बंदचमध्यम प्रकल्पांची स्थितीही अद्याप सुधारलेली नाही. मराठवाड्यातील ७५ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ५४ दलघमी (५.८३ टक्के) साठा आहे. त्याचप्रमाणे विभागातील ७३२ लघू प्रकल्पांमध्ये ११७ दलघमी म्हणजे केवळ ७.३५ टक्के साठा आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी न आल्यामुळे शेकडो गावातील पाणी पुरवठा योजना अजूनही बंदच आहेत.