शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पामूळे शेकडो एकरावरील शेतीवर सिंचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 08:33 IST

तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर

ऑनलाइन लोकमत

वाशीम, दि. 19 - तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपुर्ण गावचा कायापालट झाला असून, गाव पाणीदार बनले आहे. यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. वाशीम येथुन शेलुबाजर कडे जाणाऱ्या रस्याच्या पश्चिमेला सावंगा गाव हे उंचावर वसलेले साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावात सहा खासगी विहिरी आहेत. तसेच शासकीय नळयोजना देखील आहे. परंतु फेब्रुवारी महिना लागताच, गावात पाणीटंचाई आ वासुन उभी राहत असे. संपुर्ण गाव खडकावर व उंचीवर असल्यामुळे शेती नेहमी तोट्याचीच होती.

उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे, परंतु भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जानेवारी २०१५ मध्ये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक बलवंत गजभिये यांच्या मार्गदर्शनात ह्यआपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातुन गावाजवळुन गेलेल्या नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. सदर कामाला वर्ष उलटून गेले आहे. सध्या फेुब्रुवारी महिना लागला आहे. परंतु अद्यापही बंधाऱ्यात दहा फुट खोल पाणी कायम आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील शेतशिवार सिंचनाखाली आले आहे. शेतकरी भाजीपाला तसेच उन्हाळी पिके देखील घेत आहेत. गावातील नळयोजनेला नवसंजिवनी मिळाली आहे.

सदर कामामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून गावात समृध्दीचे वारे वाहत आहे. शासनाच्या या उपक्रमामूळे गावचे चित्र पालटले असून या महत्वाकांक्षी उपक्रमाला गती दिल्यास पाणीटंचाईने होरपळणारी गावे पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 सिंचनक्षेत्रात लक्षणीय वाढ सावंगा गावात आपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामूळे कोरडवाहू गावची ओळख पुसली असून, शेकडो एकरातील शेती सिंचनाखाली आली आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी आता उन्हाळी पिके देखील घेत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे.

संपूर्ण विदभार्ची गरज बहुतांश नद्याचे पाणी वाहून जाणारे आहे.ज्याचा फायदा परजिल्ह्यांना होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची उदभवते. भुगर्भात पाणीच नसल्यामुळे विहिरी, हातपंप कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याची साठवणुक आवश्यक आहे. त्याकरिता आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविले जाते. यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होवुन परिसरातील शेती सिंचनाखाली येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावत असून संपुर्ण विदभासार्ठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे.

आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविल्यास पाण्याचा स्त्रोत वाढतो याचा फायदा पाणी टंचाई निवारणासाठी मोलाचा ठरतो. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. - बलवंत गजभिये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक