शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
3
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
4
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
6
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
7
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
8
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
9
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
10
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
11
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
12
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
13
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
14
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
15
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
16
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
17
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
18
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
19
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
20
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पामूळे शेकडो एकरावरील शेतीवर सिंचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 08:33 IST

तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर

ऑनलाइन लोकमत

वाशीम, दि. 19 - तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपुर्ण गावचा कायापालट झाला असून, गाव पाणीदार बनले आहे. यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. वाशीम येथुन शेलुबाजर कडे जाणाऱ्या रस्याच्या पश्चिमेला सावंगा गाव हे उंचावर वसलेले साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावात सहा खासगी विहिरी आहेत. तसेच शासकीय नळयोजना देखील आहे. परंतु फेब्रुवारी महिना लागताच, गावात पाणीटंचाई आ वासुन उभी राहत असे. संपुर्ण गाव खडकावर व उंचीवर असल्यामुळे शेती नेहमी तोट्याचीच होती.

उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे, परंतु भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जानेवारी २०१५ मध्ये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक बलवंत गजभिये यांच्या मार्गदर्शनात ह्यआपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातुन गावाजवळुन गेलेल्या नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. सदर कामाला वर्ष उलटून गेले आहे. सध्या फेुब्रुवारी महिना लागला आहे. परंतु अद्यापही बंधाऱ्यात दहा फुट खोल पाणी कायम आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील शेतशिवार सिंचनाखाली आले आहे. शेतकरी भाजीपाला तसेच उन्हाळी पिके देखील घेत आहेत. गावातील नळयोजनेला नवसंजिवनी मिळाली आहे.

सदर कामामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून गावात समृध्दीचे वारे वाहत आहे. शासनाच्या या उपक्रमामूळे गावचे चित्र पालटले असून या महत्वाकांक्षी उपक्रमाला गती दिल्यास पाणीटंचाईने होरपळणारी गावे पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 सिंचनक्षेत्रात लक्षणीय वाढ सावंगा गावात आपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामूळे कोरडवाहू गावची ओळख पुसली असून, शेकडो एकरातील शेती सिंचनाखाली आली आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी आता उन्हाळी पिके देखील घेत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे.

संपूर्ण विदभार्ची गरज बहुतांश नद्याचे पाणी वाहून जाणारे आहे.ज्याचा फायदा परजिल्ह्यांना होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची उदभवते. भुगर्भात पाणीच नसल्यामुळे विहिरी, हातपंप कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याची साठवणुक आवश्यक आहे. त्याकरिता आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविले जाते. यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होवुन परिसरातील शेती सिंचनाखाली येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावत असून संपुर्ण विदभासार्ठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे.

आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविल्यास पाण्याचा स्त्रोत वाढतो याचा फायदा पाणी टंचाई निवारणासाठी मोलाचा ठरतो. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. - बलवंत गजभिये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक