शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पामूळे शेकडो एकरावरील शेतीवर सिंचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 08:33 IST

तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर

ऑनलाइन लोकमत

वाशीम, दि. 19 - तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपुर्ण गावचा कायापालट झाला असून, गाव पाणीदार बनले आहे. यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. वाशीम येथुन शेलुबाजर कडे जाणाऱ्या रस्याच्या पश्चिमेला सावंगा गाव हे उंचावर वसलेले साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावात सहा खासगी विहिरी आहेत. तसेच शासकीय नळयोजना देखील आहे. परंतु फेब्रुवारी महिना लागताच, गावात पाणीटंचाई आ वासुन उभी राहत असे. संपुर्ण गाव खडकावर व उंचीवर असल्यामुळे शेती नेहमी तोट्याचीच होती.

उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे, परंतु भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जानेवारी २०१५ मध्ये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक बलवंत गजभिये यांच्या मार्गदर्शनात ह्यआपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातुन गावाजवळुन गेलेल्या नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. सदर कामाला वर्ष उलटून गेले आहे. सध्या फेुब्रुवारी महिना लागला आहे. परंतु अद्यापही बंधाऱ्यात दहा फुट खोल पाणी कायम आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील शेतशिवार सिंचनाखाली आले आहे. शेतकरी भाजीपाला तसेच उन्हाळी पिके देखील घेत आहेत. गावातील नळयोजनेला नवसंजिवनी मिळाली आहे.

सदर कामामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून गावात समृध्दीचे वारे वाहत आहे. शासनाच्या या उपक्रमामूळे गावचे चित्र पालटले असून या महत्वाकांक्षी उपक्रमाला गती दिल्यास पाणीटंचाईने होरपळणारी गावे पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 सिंचनक्षेत्रात लक्षणीय वाढ सावंगा गावात आपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामूळे कोरडवाहू गावची ओळख पुसली असून, शेकडो एकरातील शेती सिंचनाखाली आली आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी आता उन्हाळी पिके देखील घेत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे.

संपूर्ण विदभार्ची गरज बहुतांश नद्याचे पाणी वाहून जाणारे आहे.ज्याचा फायदा परजिल्ह्यांना होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची उदभवते. भुगर्भात पाणीच नसल्यामुळे विहिरी, हातपंप कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याची साठवणुक आवश्यक आहे. त्याकरिता आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविले जाते. यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होवुन परिसरातील शेती सिंचनाखाली येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावत असून संपुर्ण विदभासार्ठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे.

आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविल्यास पाण्याचा स्त्रोत वाढतो याचा फायदा पाणी टंचाई निवारणासाठी मोलाचा ठरतो. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. - बलवंत गजभिये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक