शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पामूळे शेकडो एकरावरील शेतीवर सिंचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 08:33 IST

तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर

ऑनलाइन लोकमत

वाशीम, दि. 19 - तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपुर्ण गावचा कायापालट झाला असून, गाव पाणीदार बनले आहे. यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. वाशीम येथुन शेलुबाजर कडे जाणाऱ्या रस्याच्या पश्चिमेला सावंगा गाव हे उंचावर वसलेले साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावात सहा खासगी विहिरी आहेत. तसेच शासकीय नळयोजना देखील आहे. परंतु फेब्रुवारी महिना लागताच, गावात पाणीटंचाई आ वासुन उभी राहत असे. संपुर्ण गाव खडकावर व उंचीवर असल्यामुळे शेती नेहमी तोट्याचीच होती.

उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे, परंतु भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जानेवारी २०१५ मध्ये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक बलवंत गजभिये यांच्या मार्गदर्शनात ह्यआपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातुन गावाजवळुन गेलेल्या नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. सदर कामाला वर्ष उलटून गेले आहे. सध्या फेुब्रुवारी महिना लागला आहे. परंतु अद्यापही बंधाऱ्यात दहा फुट खोल पाणी कायम आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील शेतशिवार सिंचनाखाली आले आहे. शेतकरी भाजीपाला तसेच उन्हाळी पिके देखील घेत आहेत. गावातील नळयोजनेला नवसंजिवनी मिळाली आहे.

सदर कामामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून गावात समृध्दीचे वारे वाहत आहे. शासनाच्या या उपक्रमामूळे गावचे चित्र पालटले असून या महत्वाकांक्षी उपक्रमाला गती दिल्यास पाणीटंचाईने होरपळणारी गावे पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 सिंचनक्षेत्रात लक्षणीय वाढ सावंगा गावात आपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामूळे कोरडवाहू गावची ओळख पुसली असून, शेकडो एकरातील शेती सिंचनाखाली आली आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी आता उन्हाळी पिके देखील घेत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे.

संपूर्ण विदभार्ची गरज बहुतांश नद्याचे पाणी वाहून जाणारे आहे.ज्याचा फायदा परजिल्ह्यांना होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची उदभवते. भुगर्भात पाणीच नसल्यामुळे विहिरी, हातपंप कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याची साठवणुक आवश्यक आहे. त्याकरिता आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविले जाते. यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होवुन परिसरातील शेती सिंचनाखाली येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावत असून संपुर्ण विदभासार्ठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे.

आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविल्यास पाण्याचा स्त्रोत वाढतो याचा फायदा पाणी टंचाई निवारणासाठी मोलाचा ठरतो. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. - बलवंत गजभिये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक