शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

IPL : मुंबईतील शेवटचा सामना हाऊस फूल

By admin | Updated: April 28, 2016 18:10 IST

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरातील सामने महाराष्ट्राबाहेर हालवण्यात आले आहेत. आज मुंबई इंडियन्स संघाचा वानखेडे मैदानरील शेवटचा सामना आहे.

ऑनलइन लोकमत
मुंबई, दि. २८ : वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी तुम्ही एका तिकिटाला हजारो रुपये मोजण्याची तयारी ठेवलीत, तरीही तुमची निराशा होईल. कारण एकच, शेवटचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली तुंडुंब गर्दी. मुंबई इंडियन्स सध्या वाईट कामगिरी करत असली तरी, आज वानखेडेवर हा संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करेल आणि विजयी होऊन होम ग्राउंडला निरोप देईल अशी आशा मुंबईकरांना आहे, त्यामुळे एक ते दीड हजार रुपयांचे तिकिट पाच हजार रुपये मोजूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.
तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ असलेल्या महाराष्ट्रात, कडक निर्बंध घालून, इंड़ियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्य राज्यांत खेळवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परिणामी मे पासूनचे मुंबईतले सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरातील सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. आज मुंबई इंडियन्स संघाचा वानखेडे मैदानावरील शेवटचा सामना आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुडंब गर्दी केली आहे. वानखेडे परिसरात कडेकोट पोलिस व्यवस्था करण्यात आली आहे.
आयपीलएच्या यंदाच्या सत्रात धडाकेबाज कामगिरीसह विजयी लाटेवर स्वार झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला चढउताराचा सामना करीत असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आज गुरुवारी वानखेडेवर विजयाची आस लागली आहे. गुणांचा विचार केला, तर कोलकाता अव्वल व मुंबई पाचव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकविले आहे. त्यामुळे उभय संघ तुल्यबळ वाटतात. पण पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या कोलकाताचे पारडे सध्यातरी जड वाटते. मुंबईच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यांना सातपैकी तीनच विजय शक्य झाले तर चार सामन्यांत पराभवाला तोंड द्यावे लागले.