शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

By admin | Updated: March 3, 2016 04:32 IST

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे.

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सद्य:परिस्थितीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. हे गुन्हेगार गुंतवणुकीच्या फसव्या योजनांतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात व परदेशात पळून जातात. अशा गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तपासाच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे हे तपासणेही महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, तसेच कायदे व सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)1.20लाख कोटींची फसवणूककेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा म्हणाले की, विभागाने २०१५ मध्ये बँक घोटाळयाच्या १७१ केसेसचा तपास केला असून ही रक्कम २० हजार ६४६ कोटी रु पये आहे. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम १ लाख २० हजार कोटी इतकी आहे.