शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

By admin | Updated: March 3, 2016 04:32 IST

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे.

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सद्य:परिस्थितीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. हे गुन्हेगार गुंतवणुकीच्या फसव्या योजनांतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात व परदेशात पळून जातात. अशा गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तपासाच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे हे तपासणेही महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, तसेच कायदे व सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)1.20लाख कोटींची फसवणूककेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा म्हणाले की, विभागाने २०१५ मध्ये बँक घोटाळयाच्या १७१ केसेसचा तपास केला असून ही रक्कम २० हजार ६४६ कोटी रु पये आहे. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम १ लाख २० हजार कोटी इतकी आहे.