शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

By admin | Updated: August 2, 2014 23:17 IST

माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े

मंचर : माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी आज दिली़
माळीण येथे पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली़ पराग डेअरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आदी उपस्थित होत़े 
माळीण येथील घटना घडली, त्या वेळी विजांचा कडकडाट होत होता, पाऊस जास्त होता़ तेथील नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी मोठा आवाज झाल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील जखमींनी आवाज झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आह़े त्यामुळे आता तज्ज्ञांमार्फत खातरजमा करणार आह़े माती अथवा दगड कसे ढासळे याबाबत तज्ज्ञ शोध घेतील, हा आवाज कशाचा होता, स्फोट झाला का, याबाबत तपास करणार असल्याचे पाटील म्हणाल़े
पडकई योजनेबाबत होणा:या चर्चेमुळे स्थानिक नाराज आहेत, असे सांगून गृहमंत्री आऱ आऱ पाटील म्हणाले, येथील शेतक:यांना दोन वेळचा घास देणारी ही योजना आह़े मुळात ज्या भागात कडा कोसळला, तेथे पडकई नव्हती़  पडकई योजना आदिवासींसाठी वरदान असून ती बंद करू नका, अशी मागणी माळीण भेटीत आदिवासी बांधवांनी केल्याचे पाटील यांनी सांगितल़े  (वार्ताहर)
 
माळीण येथे आज भेट दिली, त्या वेळी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्था अधिकारी समन्वय ठेवून चांगले काम करीत असल्याचे दिसल़े 4क् टक्के काम पूर्ण झाले असून, रोगराई पसरू नये त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ जखमींवर चांगले उपचार होत आहेत़
- आऱ आऱ पाटील, 
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
 
वारज्यातील घरांना भूस्खलनाचा धोका
 
4मोठय़ा प्रामाणात टेकडीफोड व डोंगरउतारावर (हिल स्लोप) बांधकामे झाल्याने वारजे भागातही माळीण गाव दुर्घटनेचे पुनरावृत्ती होऊ शकते, असा जाणकारारांचा अंदाज आहे. या भागात मुख्यत्वे तीन डोंगर (टेकड्या) आहेत. प्रभाग तीस मध्ये विठ्ठलनगर गोकूळनगर चा वरचा भाग, तसेच आकाशनगर कडून वर खाणी कडे जाणारे भाग (बीडीपी झोन) आणि तिसरा प्रभाग 31 मधील रामनगर वसाहतीचा काही भाग हा उंचवट्यावर आहे.
4प्रभाग 3क् मधील विठ्ठलनगर व गोकूळनगर हा संपूर्ण भाग बीडीपी त असुन या ठिकाणी परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. त्यासाठी जमीन समप्रमाणात घरून घेण्यासाठी मोठ्या प्रामाणात जेसीबी लाऊन जमिनीची खोदाई करण्यात आली आहे. 
 
पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार 
मंचर : वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माळीण दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. स्थानिक ग्रामस्थांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरे तसेच संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माळीण दुर्घटनेत वाचलेल्या सहा जखमींवर उपचार सुरु आहेत. पतंगराव कदम यांनी त्यांची भेट घेतली व या घटनेविषयी जाणून घेतले. पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘‘माळीण येथे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु ठेवले आहे. पावसाचा अडथळा आला नाही तर दोन दिवसांत काम संपेल अन्यथा 4 ते 5 दिवस लागतील. सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून वाचलेल्या लोकांना भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
 
4ग्रामस्थांशी बोलून या भागातील नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगून कदम म्हणाले, ‘‘घर तसेच भांडी व इतर गरजेच्या वस्तू दिल्या जातील. राज्यात जर अशी जी धोकादायक ठिकाणो आहेत त्यांचा सव्र्हे केला जाईल. डोंगर, पठार, अशा सर्व धोकादायक ठिकाणची पाहणी केली जाईल. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.