शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

By admin | Updated: August 2, 2014 23:17 IST

माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े

मंचर : माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी आज दिली़
माळीण येथे पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली़ पराग डेअरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आदी उपस्थित होत़े 
माळीण येथील घटना घडली, त्या वेळी विजांचा कडकडाट होत होता, पाऊस जास्त होता़ तेथील नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी मोठा आवाज झाल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील जखमींनी आवाज झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आह़े त्यामुळे आता तज्ज्ञांमार्फत खातरजमा करणार आह़े माती अथवा दगड कसे ढासळे याबाबत तज्ज्ञ शोध घेतील, हा आवाज कशाचा होता, स्फोट झाला का, याबाबत तपास करणार असल्याचे पाटील म्हणाल़े
पडकई योजनेबाबत होणा:या चर्चेमुळे स्थानिक नाराज आहेत, असे सांगून गृहमंत्री आऱ आऱ पाटील म्हणाले, येथील शेतक:यांना दोन वेळचा घास देणारी ही योजना आह़े मुळात ज्या भागात कडा कोसळला, तेथे पडकई नव्हती़  पडकई योजना आदिवासींसाठी वरदान असून ती बंद करू नका, अशी मागणी माळीण भेटीत आदिवासी बांधवांनी केल्याचे पाटील यांनी सांगितल़े  (वार्ताहर)
 
माळीण येथे आज भेट दिली, त्या वेळी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्था अधिकारी समन्वय ठेवून चांगले काम करीत असल्याचे दिसल़े 4क् टक्के काम पूर्ण झाले असून, रोगराई पसरू नये त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ जखमींवर चांगले उपचार होत आहेत़
- आऱ आऱ पाटील, 
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
 
वारज्यातील घरांना भूस्खलनाचा धोका
 
4मोठय़ा प्रामाणात टेकडीफोड व डोंगरउतारावर (हिल स्लोप) बांधकामे झाल्याने वारजे भागातही माळीण गाव दुर्घटनेचे पुनरावृत्ती होऊ शकते, असा जाणकारारांचा अंदाज आहे. या भागात मुख्यत्वे तीन डोंगर (टेकड्या) आहेत. प्रभाग तीस मध्ये विठ्ठलनगर गोकूळनगर चा वरचा भाग, तसेच आकाशनगर कडून वर खाणी कडे जाणारे भाग (बीडीपी झोन) आणि तिसरा प्रभाग 31 मधील रामनगर वसाहतीचा काही भाग हा उंचवट्यावर आहे.
4प्रभाग 3क् मधील विठ्ठलनगर व गोकूळनगर हा संपूर्ण भाग बीडीपी त असुन या ठिकाणी परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. त्यासाठी जमीन समप्रमाणात घरून घेण्यासाठी मोठ्या प्रामाणात जेसीबी लाऊन जमिनीची खोदाई करण्यात आली आहे. 
 
पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार 
मंचर : वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माळीण दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. स्थानिक ग्रामस्थांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरे तसेच संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माळीण दुर्घटनेत वाचलेल्या सहा जखमींवर उपचार सुरु आहेत. पतंगराव कदम यांनी त्यांची भेट घेतली व या घटनेविषयी जाणून घेतले. पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘‘माळीण येथे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु ठेवले आहे. पावसाचा अडथळा आला नाही तर दोन दिवसांत काम संपेल अन्यथा 4 ते 5 दिवस लागतील. सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून वाचलेल्या लोकांना भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
 
4ग्रामस्थांशी बोलून या भागातील नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगून कदम म्हणाले, ‘‘घर तसेच भांडी व इतर गरजेच्या वस्तू दिल्या जातील. राज्यात जर अशी जी धोकादायक ठिकाणो आहेत त्यांचा सव्र्हे केला जाईल. डोंगर, पठार, अशा सर्व धोकादायक ठिकाणची पाहणी केली जाईल. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.