शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

तंत्रशिक्षण संचालकांची चौकशी करा

By admin | Updated: July 2, 2016 02:43 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्ष व सचिव आणि प्राचार्य यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने ३० मार्च रोजी दिले होते.

मुंबई : पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्ष व सचिव आणि प्राचार्य यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने ३० मार्च रोजी दिले होते. मात्र त्याचे पालन केले नाही, म्हणून तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांची चौकशी करण्याची मागणी मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (मुक्टा) केली आहे.मुक्टाचे सचिव सुभाष आठवले म्हणाले की, पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्ष व सचिव आणि प्राचार्य यांनी प्रशासनाला खोटी आणि चुकीची माहिती दिली होती. संस्थेने मान्यतेसाठी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे संचालक यांनीही प्रधान सचिवांना कळवले होते. त्यानंतर शासनाने महाविद्यालयावर १० दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाला तीन महिने उलटल्यानंतरही संचालकांनी फौजदारी कारवाई केली नसल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. न्यायालयाने एआयसीटीई आणि डीटीई यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत महाविद्यालयाच्या मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र स्थगिती देताना महाविद्यालयात त्रुटी असून त्याची पूर्तता कशी करणार, असे प्रतिज्ञापत्र मागितलेले आहे. त्यामुळे न्यायालयाचे स्थगिती आदेश आणि महाविद्यालयाने सादर केलेली खोटी माहिती या दोनही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.>धोक्याबाबत माहिती स्पष्ट करा!उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेले असून, अद्याप न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. तरी विद्यार्थ्यांनी आपआपल्या जबाबदारीवरच या महाविद्यालयात प्रवेश घ्यावेत, असे डीटीईच्या बेवसाइटवर नमूद केलेले नाही. शिवाय वर्तमानपत्रात प्रवेशाच्या जाहिराती देतानादेखील विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्पुरते आहेत, हा न्यायालयाचा आदेश असूनही जाहिरातीमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. कॉलेजच्या माहिती पत्रकात (प्रोस्पेक्ट्स) देखील त्याचा उल्लेख नाही. तरी यासंदर्भात महाजन हे केवळ बघ्याची भूमिका घेत असून कारवाई झाली नसल्याचे मुक्टाचे म्हणणे आहे.राज्यपालांना साकडेसर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपाल विद्यासागर राव यांनी डॉ. सुभाष महाजन यांची या प्रकरणी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी मुक्टाने केली आहे. शिवाय महाजन यांच्यावर कारवाई करतानाच, डीटीईच्या संकेतस्थळावर आणि आतापर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचे आदेश निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहनही मुक्टाने केले आहे.