शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

२०६ कोटींच्या खरेदीची चौकशी करा - काँग्रेस

By admin | Updated: June 25, 2015 02:22 IST

महिला व बालविकास विभागाने सर्व नियम, आदेश डावलून केलेल्या २०६ कोटीच्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी

मुंबई : महिला व बालविकास विभागाने सर्व नियम, आदेश डावलून केलेल्या २०६ कोटीच्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता असल्याने सदर विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे पालवे यांच्यासह सचिव, आयुक्त व सर्व संबंधितांची व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, महिला व बालविकास खात्यातील २०६ कोटींच्या खरेदीचे गौडबंगाल सर्वप्रथम ‘लोकमत’ने ३० मे व २ जूनच्या अंकात उघडकीस आणले होते. त्यानंतर इतर माध्यमांनी त्याची दखल घेतली, तर कॉंग्रेसने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणावरून येत्या अधिवेशानत सरकारची चांगलीच पंचाईत होण्याची चिन्हे आहेत.बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रवीणकुमार दीक्षित यांची काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी भेट घेऊन तक्रार दाखल केली. राज्यातल्या अंगणवाड्यांना शिक्षणोपयोगी साहित्य, पौष्टिक आहार व इतर वस्तुंचा पुरवठा करताना महिला व बालविकास विभागाने नियमांचे उल्लंघन केले आणि त्यामध्ये त्यांना आर्थिक लाभ झाल्याचे दिसून येते. या खरेदीमध्ये मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांना कंत्राटे देण्यात आली. परंतु, त्या पश्चातही निविदा न मागवता केवळ दरपत्रकाच्या आधारे करण्यात आली आहे. या खरेदी आदेशाची एकही प्रत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली नाही. खरेदीचे प्रस्ताव १२ फेब्रुवारीला आयुक्तांकडे दाखल केले जातात आणि त्याला लगेच दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारीला मान्यता देण्यात येते, हे आश्चर्यजनक आहे. नेमकी किती खरेदीची गरज आहे, याचा विचार न करताच ही खरेदी झाल्याने एसीबीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.माझ्याविरूद्ध राजकीय षडयंत्रमी ग्रामीण विकास व जलसंधारण मंत्री म्हणून ऐतिहासिक काम केले आहे. माझ्याआधी महिला व बालकल्याण विभाग ज्या पद्धतीने सांभाळला जात होता, त्याबद्दल मला दु:ख होते. मी कुठेलेही नियम- कायदे मोडलेले नाहीत. केलेली खरेदी केंद्र सरकारच्या नियमानुसारच आहे. अधिकृत दर करार उपलब्ध असल्याने ई- निविदा पद्धतीचा प्रश्नच येत नाही. ही कंत्राटे कोणत्याही मान्यता प्राप्त नसलेल्या संस्थांना दिलेली नाहीत. जे केले आहे, ते नियमांच्या अधीन राहून केले आहे. असे पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे.