शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली मालेगाव स्फोटाचा तपास करा

By admin | Updated: May 17, 2016 03:09 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’च्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. दिवंगत हेमंत करकरे यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याने केलेला तपास चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मतही त्यांनी मांडले. दुष्काळग्रस्तांना राज्य शासनाची मदत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य शासन दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या शहरांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना २० दिवसांनंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. केंद्रात आघाडीचे सरकार असताना ते दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी होते. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आताच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरचे माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या निधनानंतर घुले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार सोमवारी नगरला आले होते. (प्रतिनिधी)>तपासातील निष्कर्ष जाहीर करा : प्रकाशमुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती.मनमोहन सिंग यांनी तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत. आज करकरेंच्या तपासावर आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्यावेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे, अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जीवालाही धोका असल्याचेही करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली.