शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

गुंतवणुकीत वर्षभरात गुजरातला मागे टाकू

By admin | Updated: November 17, 2014 00:53 IST

औद्योगिक क्षेत्रात गुजरात पुढे की महाराष्ट्र, याबाबत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राजकीय स्पर्धा अद्यापही कायम आहे. तेंव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आता देशाचे पंतप्रधान झाले आहेत

मुख्यमंत्री : एक लाख कोटींची गुंतवणूक येणारनागपूर: औद्योगिक क्षेत्रात गुजरात पुढे की महाराष्ट्र, याबाबत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राजकीय स्पर्धा अद्यापही कायम आहे. तेंव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आता देशाचे पंतप्रधान झाले आहेत तर त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक वर्षात गुजरातला मागे टाकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी येथे व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात अनेक देशी आणि विदेशी उद्योजक, कंपन्यांशी चर्चा झाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास उद्योजक तयार आहेत. येत्या एक ते दीड महिन्यात महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. त्यातील जास्तीत जास्त गुंतवणूक विदर्भात आणण्याचा आपला प्रयत्न राहील, या वर्षात आम्ही गुजरातला मागे टाकणार,असे फडणवीस म्हणाले.‘त्या’ पोलिसाच्या पत्नीला मदतमुंबईत हत्या झालेल्या पोलिसाच्या पत्नीला शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल. त्या पोलिसाची जेवढी सेवा शिल्लक असेल तेवढा पगार त्याच्या पत्नीला देतानांच इतर मदतही केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.नगर विकासचे प्रस्ताव१५ दिवसात मार्गीअनेक वर्षापासून रखडलेल्या मेट्रोरिजन डी.पी. प्लॅनसह नागपूर शहरातील नगर विकास खात्याच्या संदर्भात राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव मागविण्यात आले असून येत्या दोन आठवड्यात मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.पोलिसांसाठी घरेपोलिसांसाठी घरे देण्यासंदर्भातील फाईल दीड वर्षापासून तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे पडून होती. ती मागवण्यात आली असून त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.विमानतळासाठी बल्लारपूरला जागाचंद्रपूर येथे विमानतळ बांधण्याचा सरकारचा विचार होता. पण तेथे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे बल्लापूर येथे एका जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील आराखडा प्राप्त झाल्यावर तो मंजूर केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. चंद्रपूर प्रमाणेच अमरावती विमानतळासाठी निधी देण्यात आला असून अकोला विमानतळावरची धावपट्टी वाढविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.केंद्राचा भूसंपादन कायदा जाचककेंद्राचा भूसंपादन कायदा जाचक असून त्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. विद्यमान कायद्यामुळे उद्योगासाठी किंवा विकास प्रकल्पांसाठी जागा अधिग्रहित करणे अवघड आहे. हा कायदा असाच राहिला तर कुठल्याही राज्यात उद्योग येणार नाहीत. एकही राज्य या कायद्याला अनुकूल नाही. त्यामुळे यावर फेरविचार करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)