शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दलित हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

By admin | Updated: November 11, 2014 02:06 IST

अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा,

हायकोर्टात याचिका : 25 लाख नुकसानभरपाई द्या; मुख्यमंत्री प्रतिवादी
अमर मोहिते ल्ल मुंबई
अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
ऐन दिवाळीत झालेल्या या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हळहळला. सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. मारेक:यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप एकही मारेकरी न सापडल्याने ही याचिका दाखल झाली आहे.
प्रा. अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर ङोंडे व सुनील पवार यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. दलित अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली दक्षता व देखरेख समिती योग्य प्रकारे काम करीत नसल्यानेच दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. दलित अत्याचार खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना होणार होती. मात्र विशेष न्यायालयही अजून स्थापन झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या समितीची बैठक घ्यावी, असे याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे.  मुंबईसह राज्यातील आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रस होत आहे. मात्र हे टाळण्यासाठी दलितांवरील अत्याचार रोखणो आवश्यक आहे. त्या दृष्टीने न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेत मुख्यमंत्री, गृहविभाग, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, अहमदनगर पोलीस अधीक्षक व उप पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी होण्यासाठी अॅड. सदावर्ते 
मंगळवारी) न्यायालयाचे लक्ष वेधणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पाथर्डी हत्याकांडाविरोधात धरणो आंदोलन
मुंबई : पाथर्डी हत्याकांतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत ब्लू टायगर संघटनेने सोमवारी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले. येत्या 1क् दिवसांत प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर मुंबई बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
अत्याचाराच्या या घटनेमुळे राज्यभर दलित तरुणांत असंतोषाची लाट पसरली आहे.  या  प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी संघटनेचे विलास रुपवते यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मागील काही महिन्यांतील दलित अत्याचाराच्या घटना पाहता या जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणीही आंदोलनकत्र्यानी केली. अत्याचारात मृत्यू पावलेल्या जाधव कुटुंबातील नातेवाइकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे. या प्रकरणाचा खटला तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सोशल नेटवर्किग साइट्सवर एकत्र आलेल्या काही तरुणांनी या संघटनेची स्थापना केली आहे. 1क् दिवसांत संघटनेने केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर 21 नोव्हेंबरला मुंबई बंदचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)