शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दलित हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

By admin | Updated: November 11, 2014 02:06 IST

अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा,

हायकोर्टात याचिका : 25 लाख नुकसानभरपाई द्या; मुख्यमंत्री प्रतिवादी
अमर मोहिते ल्ल मुंबई
अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
ऐन दिवाळीत झालेल्या या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हळहळला. सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. मारेक:यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप एकही मारेकरी न सापडल्याने ही याचिका दाखल झाली आहे.
प्रा. अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर ङोंडे व सुनील पवार यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. दलित अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली दक्षता व देखरेख समिती योग्य प्रकारे काम करीत नसल्यानेच दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. दलित अत्याचार खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना होणार होती. मात्र विशेष न्यायालयही अजून स्थापन झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या समितीची बैठक घ्यावी, असे याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे.  मुंबईसह राज्यातील आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रस होत आहे. मात्र हे टाळण्यासाठी दलितांवरील अत्याचार रोखणो आवश्यक आहे. त्या दृष्टीने न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेत मुख्यमंत्री, गृहविभाग, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, अहमदनगर पोलीस अधीक्षक व उप पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी होण्यासाठी अॅड. सदावर्ते 
मंगळवारी) न्यायालयाचे लक्ष वेधणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पाथर्डी हत्याकांडाविरोधात धरणो आंदोलन
मुंबई : पाथर्डी हत्याकांतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत ब्लू टायगर संघटनेने सोमवारी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले. येत्या 1क् दिवसांत प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर मुंबई बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
अत्याचाराच्या या घटनेमुळे राज्यभर दलित तरुणांत असंतोषाची लाट पसरली आहे.  या  प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी संघटनेचे विलास रुपवते यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मागील काही महिन्यांतील दलित अत्याचाराच्या घटना पाहता या जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणीही आंदोलनकत्र्यानी केली. अत्याचारात मृत्यू पावलेल्या जाधव कुटुंबातील नातेवाइकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे. या प्रकरणाचा खटला तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सोशल नेटवर्किग साइट्सवर एकत्र आलेल्या काही तरुणांनी या संघटनेची स्थापना केली आहे. 1क् दिवसांत संघटनेने केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर 21 नोव्हेंबरला मुंबई बंदचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)