शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

धाकधूक , उत्सुकता अन् आनंदही!

By admin | Updated: February 19, 2016 01:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी उत्साही वातावरणात परीक्षेला सामोरे गेले. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. परंतु, पेपर सोपा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील भावे हायस्कूलसह विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावर्षी अभिनव कला भारतीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सहसचिव अनिल गुंजाळ व शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे आदी उपस्थित होते. या वेळी म्हमाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रसन्न वातावरणात परीक्षा द्यावी. त्याच प्रमाणे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे. शहरातील काही संस्था-संघटनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी मराठा हायस्कूलने विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. पहिला दिवस असल्याने काही पालक मुलांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यास आले होते. तर काही विद्यार्थी दुचाकीवरून आले होते. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मित्रांशी गप्पा मारून पुढील पेपरच्या तयारीबाबत चर्चा केली तर काहींनी पुढील पेपरच्या अभ्यासासाठी घर गाठले. नवी पेठ येथील सौरभ गालिंदे म्हणाला, पेपरचा सर्व अभ्यास झालेला असल्यामुळे पेपर सोपा गेला. रस्ते खोदून ठेवलेले असल्याने वाहतूककोंडी झाली होती.शंतनू त्रिभुवन म्हणाला, पेपर चांगला होता. जवळचे परीक्षा केंद्र मिळाल्याने केंद्रावर पोहचण्यास अडचण आली नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याची माहिती राज्य मंडळातर्फे सांगण्यात आली. औरंगाबाद विभागापाठोपाठ नाशिक विभागात १३, पुणे विभागात ५, नागपूरमध्ये ५, मुंबई विभागात १, अमरावतीमध्ये ५ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले.