शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

धाकधूक , उत्सुकता अन् आनंदही!

By admin | Updated: February 19, 2016 01:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी उत्साही वातावरणात परीक्षेला सामोरे गेले. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. परंतु, पेपर सोपा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील भावे हायस्कूलसह विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावर्षी अभिनव कला भारतीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सहसचिव अनिल गुंजाळ व शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे आदी उपस्थित होते. या वेळी म्हमाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रसन्न वातावरणात परीक्षा द्यावी. त्याच प्रमाणे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे. शहरातील काही संस्था-संघटनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी मराठा हायस्कूलने विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. पहिला दिवस असल्याने काही पालक मुलांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यास आले होते. तर काही विद्यार्थी दुचाकीवरून आले होते. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मित्रांशी गप्पा मारून पुढील पेपरच्या तयारीबाबत चर्चा केली तर काहींनी पुढील पेपरच्या अभ्यासासाठी घर गाठले. नवी पेठ येथील सौरभ गालिंदे म्हणाला, पेपरचा सर्व अभ्यास झालेला असल्यामुळे पेपर सोपा गेला. रस्ते खोदून ठेवलेले असल्याने वाहतूककोंडी झाली होती.शंतनू त्रिभुवन म्हणाला, पेपर चांगला होता. जवळचे परीक्षा केंद्र मिळाल्याने केंद्रावर पोहचण्यास अडचण आली नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याची माहिती राज्य मंडळातर्फे सांगण्यात आली. औरंगाबाद विभागापाठोपाठ नाशिक विभागात १३, पुणे विभागात ५, नागपूरमध्ये ५, मुंबई विभागात १, अमरावतीमध्ये ५ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले.