शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धाकधूक , उत्सुकता अन् आनंदही!

By admin | Updated: February 19, 2016 01:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी उत्साही वातावरणात परीक्षेला सामोरे गेले. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. परंतु, पेपर सोपा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील भावे हायस्कूलसह विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावर्षी अभिनव कला भारतीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सहसचिव अनिल गुंजाळ व शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे आदी उपस्थित होते. या वेळी म्हमाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रसन्न वातावरणात परीक्षा द्यावी. त्याच प्रमाणे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे. शहरातील काही संस्था-संघटनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी मराठा हायस्कूलने विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. पहिला दिवस असल्याने काही पालक मुलांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यास आले होते. तर काही विद्यार्थी दुचाकीवरून आले होते. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मित्रांशी गप्पा मारून पुढील पेपरच्या तयारीबाबत चर्चा केली तर काहींनी पुढील पेपरच्या अभ्यासासाठी घर गाठले. नवी पेठ येथील सौरभ गालिंदे म्हणाला, पेपरचा सर्व अभ्यास झालेला असल्यामुळे पेपर सोपा गेला. रस्ते खोदून ठेवलेले असल्याने वाहतूककोंडी झाली होती.शंतनू त्रिभुवन म्हणाला, पेपर चांगला होता. जवळचे परीक्षा केंद्र मिळाल्याने केंद्रावर पोहचण्यास अडचण आली नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याची माहिती राज्य मंडळातर्फे सांगण्यात आली. औरंगाबाद विभागापाठोपाठ नाशिक विभागात १३, पुणे विभागात ५, नागपूरमध्ये ५, मुंबई विभागात १, अमरावतीमध्ये ५ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले.