शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार!

By admin | Updated: April 6, 2017 02:07 IST

महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला

मुंबई : महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला आहे. याचे खापर अप्रत्यक्ष शिवसेनेवर फोडून भाजपा नेते नामनिराळे राहिले आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचे पहारेकरी सत्ताधारी शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहेत. वैधानिक समित्यांचा लेखाजोखा महापालिका प्रशासनाने दर तीन महिन्यांनी स्थायी समितीमध्ये मांडावा, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही कार्यअहवाल सादर करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. या संदर्भात पालिकेने निवेदन सादर केले. या निवेदनावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. कधीपासून लेखापरीक्षण कार्यअहवाल प्रलंबित आहे, याची माहिती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मागितली. तेव्हा गेल्या २२ वर्षांपासून परीक्षण कार्यअहवाल सादर न झाल्याचे समोर आले. आयुक्तांनी तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचा ठराव आहे. या ठरावानुसार २० वर्षे कार्यअहवाल सादर का केला नाही, इतकी वर्षे कार्यअहवाल विचारात न घेता, अर्थसंकल्प सादर कसा काय केला जातो? असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. गेली २१ वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. त्यामुळे लेख परीक्षण झाले नसल्यास सत्ताधारी अडचणीत येतील. मात्र, हा विषय स्वत: मांडून भाजपाने आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)।अन्यथा अर्थसंकल्पाला मंजुरी नाही आॅडिटसाठी टाळाटाळ करून जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार केला जात आहे.विकासाला खीळ बसली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन मिळून मुंबईचे नुकसान करत आहेत. कार्यअहवाल सादर न केल्यास अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे रवी राजा यांनी दिला. ।लढा पारदर्शकतेसाठीच...आमचा लढा हा पारदर्शकतेसाठी असून, आता आम्ही पहारेकरी म्हणून करीत आहोत. लेखा परीक्षण झाले नाही, हा प्रकार गंभीर आहे. जनतेच्या कराच्या रूपाने आलेल्या पैशाचा योग्य हिशेब ठेवलाच पाहिजे. याचा जाब विचारणारच, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपाचे मनोज कोटक यांनी शिवसेनेला दिला.तीन महिन्यांत मांडणार लेखाजोखापैशाचा विनियोग कसा करणार, १९९२ मध्ये काँग्रेसचा महापौर सोडला, तर गेली २५ वर्षे शिवसेनाच सत्तेवर आहे. त्यामुळे या प्रकाराला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. करदात्यांच्या पैशांचा हिशोब ठेवला जात नाही. शिवसेनेचे महापौर मिलिंद वैद्य यांच्या कार्यकाळापासून आॅडिट झालेले नाही.