शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली

By admin | Updated: February 19, 2016 03:32 IST

आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे

मुंबई : ‘आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे. कलाकुसरीचे साहित्य राज्याबाहेर विक्रीसाठी न्यायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रदर्शन भरावण्यात आर्थिक अडचणी येत होत्या. ‘मेक इन इंडिया’ने हे सर्व अडथळे दूर केले, आमच्या कलेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ खुली झाली, अशा शब्दांत कलाकार आणि व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. सप्ताहात सहभागी झालेल्या कलाकार व व्यवसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. दगडांचे शिल्प बनविणारे तामिळनाडूमधील देव राज शिल्पी म्हणाले, ‘या सप्ताहामुळे मुंबईत कला सादर करण्याची संधी मिळाली. विविध राज्यातील कलाकरांशी संवाद साधता आला.’ मातीची भांडी बनविणारे ठाणे येथील कलाकार बी. आर. पंडित यांनी कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या तामिळनाडूमधील थंगा जोथी यांनी आर्थिक राजधानीत विविध प्रकारचे ग्राहक भेटल्याचे नमूद केले. येवला येथील पैठणीकार रमेश सिंग रामसिंग परदेसी यांनी पैठणीला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अलंकार बनविणाऱ्या आसाममधील महिला व्यवसायिकांनी दालनाला लाखो प्रेक्षकांनी भेट दिल्याचे सांगितले. नवे ग्राहक जोडले गेल्याबद्दल, नव्या कल्पना कल्पना सूचल्याबद्दल आणि मोठे व्यासपीठ मिळाल्याबद्दल बहुतेक उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. धातूपासून कलाकुसरीची भांडी बनविणारे दिल्ली येथील हाजी नसरुद्दीन यांनी देशभरातील कलाकरांसह उद्योजकांशी संवाद साधता आल्याने नव्या कल्पना सुचल्याचे सांगितले. लाकाडावर कलाकुसर करणारे दिल्लीमधील इर्शद फारुकी यांनीही राज्याबाहेरील ग्राहक जोडले गेल्याचे सांगितले.शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, औद्योगिक संस्थांचे प्रशिक्षणार्थी, प्रतिनिधींनी सप्ताहाला भेट दिली. ‘स्कील इंडिया आणि स्टार्टअप इंडिया’ या दालनातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी होती. आयआयटी पॅव्हेलियन, इंडिया डिझाईन शो, इंडियन स्कूल आॅफ डिझायन अँड इनोव्हेशन ही दालने विद्यार्थ्यांना आकर्षित करत होती.आॅटोमोबाइल्स, अवकाश व संरक्षण, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स, बांधकाम यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक साहित्य आणि यंत्रसामग्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योगांच्या दालनांना भेटी देणाऱ्या नागरिकांनी सप्ताहाबाबत समाधान व्यक्त केले. ज्ञानात भर पडल्याचे आणि विविध शैक्षणिक संस्थांची माहिती मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेवटच्या दिवशी गर्दी ओसंडून वाहत होती.