शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली

By admin | Updated: February 19, 2016 03:32 IST

आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे

मुंबई : ‘आम्ही कलाकुसरीचे साहित्य आमच्याच गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विकत होतो. शहरात जाण्याची संधी क्वचितच मिळत असे. कलाकुसरीचे साहित्य राज्याबाहेर विक्रीसाठी न्यायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रदर्शन भरावण्यात आर्थिक अडचणी येत होत्या. ‘मेक इन इंडिया’ने हे सर्व अडथळे दूर केले, आमच्या कलेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ खुली झाली, अशा शब्दांत कलाकार आणि व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. सप्ताहात सहभागी झालेल्या कलाकार व व्यवसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. दगडांचे शिल्प बनविणारे तामिळनाडूमधील देव राज शिल्पी म्हणाले, ‘या सप्ताहामुळे मुंबईत कला सादर करण्याची संधी मिळाली. विविध राज्यातील कलाकरांशी संवाद साधता आला.’ मातीची भांडी बनविणारे ठाणे येथील कलाकार बी. आर. पंडित यांनी कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या तामिळनाडूमधील थंगा जोथी यांनी आर्थिक राजधानीत विविध प्रकारचे ग्राहक भेटल्याचे नमूद केले. येवला येथील पैठणीकार रमेश सिंग रामसिंग परदेसी यांनी पैठणीला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अलंकार बनविणाऱ्या आसाममधील महिला व्यवसायिकांनी दालनाला लाखो प्रेक्षकांनी भेट दिल्याचे सांगितले. नवे ग्राहक जोडले गेल्याबद्दल, नव्या कल्पना कल्पना सूचल्याबद्दल आणि मोठे व्यासपीठ मिळाल्याबद्दल बहुतेक उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. धातूपासून कलाकुसरीची भांडी बनविणारे दिल्ली येथील हाजी नसरुद्दीन यांनी देशभरातील कलाकरांसह उद्योजकांशी संवाद साधता आल्याने नव्या कल्पना सुचल्याचे सांगितले. लाकाडावर कलाकुसर करणारे दिल्लीमधील इर्शद फारुकी यांनीही राज्याबाहेरील ग्राहक जोडले गेल्याचे सांगितले.शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, औद्योगिक संस्थांचे प्रशिक्षणार्थी, प्रतिनिधींनी सप्ताहाला भेट दिली. ‘स्कील इंडिया आणि स्टार्टअप इंडिया’ या दालनातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी होती. आयआयटी पॅव्हेलियन, इंडिया डिझाईन शो, इंडियन स्कूल आॅफ डिझायन अँड इनोव्हेशन ही दालने विद्यार्थ्यांना आकर्षित करत होती.आॅटोमोबाइल्स, अवकाश व संरक्षण, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स, बांधकाम यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक साहित्य आणि यंत्रसामग्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योगांच्या दालनांना भेटी देणाऱ्या नागरिकांनी सप्ताहाबाबत समाधान व्यक्त केले. ज्ञानात भर पडल्याचे आणि विविध शैक्षणिक संस्थांची माहिती मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेवटच्या दिवशी गर्दी ओसंडून वाहत होती.