शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

२६ नोव्हेंबरपर्यंत ‘त्या’ चौघांना अंतरिम दिलासा

By admin | Updated: November 24, 2015 02:49 IST

परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

मुंबई : परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. या दरम्यान चौघांनाही राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमावारी दिले. ठाण्याचे बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल ठाण्याचे काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अटक होईल, या भीतीने काही दिवस हे चौघेही भूमिगत होते. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुटीकालीन खंडपीठाने ३ नोव्हेंबरला चौघांनाही अंतरिम दिलासा देत सरकारला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी न्या. गडकरी यांच्यापुढे सरकारचे उत्तर दाखल केले. या चौघांवरील गुन्हाची पोलीस चौकशी करणे आवश्यक आहे. ते पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यावर न्या. गडकरी यांनी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याचे निर्देश देत २६ नोव्हेंबरपर्यंत या चौघांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)