शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२६ नोव्हेंबरपर्यंत ‘त्या’ चौघांना अंतरिम दिलासा

By admin | Updated: November 24, 2015 02:49 IST

परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

मुंबई : परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. या दरम्यान चौघांनाही राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमावारी दिले. ठाण्याचे बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल ठाण्याचे काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अटक होईल, या भीतीने काही दिवस हे चौघेही भूमिगत होते. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुटीकालीन खंडपीठाने ३ नोव्हेंबरला चौघांनाही अंतरिम दिलासा देत सरकारला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी न्या. गडकरी यांच्यापुढे सरकारचे उत्तर दाखल केले. या चौघांवरील गुन्हाची पोलीस चौकशी करणे आवश्यक आहे. ते पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यावर न्या. गडकरी यांनी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याचे निर्देश देत २६ नोव्हेंबरपर्यंत या चौघांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)