शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना व्याजमाफी?

By admin | Updated: May 8, 2016 02:24 IST

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून २००९-१०पासून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची

- विश्वास पाटील,  कोल्हापूर

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून २००९-१०पासून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागविली आहे. येत्या ११ मेपर्यंत ही माहिती जमा करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. माहिती संकलित झाल्यानंतर राज्य सरकारकडून टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीककर्जावरील व्याजमाफीची घोषणा होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. सहकार विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्यामुळे त्याला कर्जमाफीच द्यावी, अशी मागणी मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. त्यातच औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येणे शक्य आहे का, यासंबंधीची माहिती सादर करण्याचे आदेश गुरुवारीच (दि. ५) सरकारला दिले. त्या आदेशांची दखल घेऊन त्याच दिवशी सरकारने ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.सरसकट कर्जमाफी न देता गतवर्षीच्या कर्जावरील सर्व व्याज माफ करायचे असा विचार सरकार करीत आहे. ते माफ केल्यानंतर जी एकूण थकबाकी राहील तिचे पुनर्गठन करून त्या कर्जाचे हप्ते पाडून देण्यात येतील. त्यामुळे शेतकरी थकबाकीतून बाहेर पडेल. त्याचा परिणाम असा होईल की तो पुन्हा नवे कर्ज घेण्यास पात्र ठरू शकेल, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनास रिझर्व्ह बँकेची पूर्वमान्यता घ्यावयाची आहे. त्यासाठी २००९-१०पासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांकडील थकबाकीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी थकीत कर्जाची माहिती तातडीने संकलित करण्यात यावी.’’केंद्र शासनाने २००८ला कर्जमाफी दिली त्यानंतर राज्य शासनाने २००९ला कर्जमाफी दिली. त्यानंतर कोणत्या सालामध्ये किती शेतकऱ्यांची थकबाकी आहे, हे समजावे यासाठीच ही माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यामागे अन्य कोणताही हेतू अथवा कारण नाही.- चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त