शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार

By admin | Updated: August 10, 2014 02:35 IST

‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

श्रीनारायण तिवारी - मुंबई
आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामे लक्षात घेता आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारलाच पसंती देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 
‘लोकमत’शी बातचीत करताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा लेखाजोखा मांडला. लोकसभा निवडणुकीदरम्यान खोटय़ा आश्वासनांचा आणि खोटय़ा दाव्यांचा डोंगर उभारला गेला. काही काळासाठी जनता या दाव्याला भुलली. 
ही फसवणूक आता जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे मोदींची लाट पुरती ओसरली आहे. जनता आता महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची सूत्रे जातीयवादी शक्तींच्या हाती देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
1995 साली जनतेने युतीकडे सत्ता सोपविली होती. त्याचे परिणामही जनतेने पाहिले. पुन्हा एकदा 95ची पुनरावृत्ती जनता करणार नाही. ‘अँटी इन्कम्बसी’बाबत जी 
चर्चा चालू आह़ेत्यात काही तथ्य नाही. राज्यात सतत तीनवेळा आणि केंद्रात दोनवेळा आघाडीचे सरकार बनले. यावेळी मोदींच्या खोटय़ा दाव्यांमुळे आणि प्रचारामुळे आघाडी सरकारचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धनगर आरक्षणाची मागणी न्याय्य असल्याचे मान्य करतानाच यातील कायदेशीर अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल आज अनेक होर्डिग्ज् लागल्याचे दिसतायत. पण, हा निर्णय माङया सरकारने घेतला. त्यासाठी राणो समितीची स्थापना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
लोकसभा निवडणुकीत मनसेने पत्करलेल्या शरणागतीमुळे त्यांचे अस्तित्व संपणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसेने आगामी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली नाहीतर त्याचा मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
 
बंड इतिहासजमा
उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या बंडाचा विषय आता इतिहास जमा झाला आहे. निवडणुका माङयाच नेतृत्त्वाखाली लढविल्या जातील. प्रचार प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी राणोंकडे सोपविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम
च्काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी भक्कम आहे. दोन्ही पक्ष आगामी निवडणूक एकत्र लढतील आणि धर्माध शक्तींना रोखतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.  
च्जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आपण तत्परता दाखविली. बिल्डरधार्जिण्या निर्णयांकडे कानाडोळा केल्यामुळेच आपल्यावर संथ कारभाराचा आरोप करण्यात आला. 
च्मेट्रो, मोनो रेल, पूर्व मुक्तवाहिनी, सांताक्रूझ लिंक रोड, 17 उड्डाणपूल,
मिहान, गोसीखुर्द अशी अनेक विकासकामे झाली. जनता त्याची नक्कीच दखल घेईल.