शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार

By admin | Updated: August 10, 2014 02:35 IST

‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

श्रीनारायण तिवारी - मुंबई
आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामे लक्षात घेता आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारलाच पसंती देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 
‘लोकमत’शी बातचीत करताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा लेखाजोखा मांडला. लोकसभा निवडणुकीदरम्यान खोटय़ा आश्वासनांचा आणि खोटय़ा दाव्यांचा डोंगर उभारला गेला. काही काळासाठी जनता या दाव्याला भुलली. 
ही फसवणूक आता जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे मोदींची लाट पुरती ओसरली आहे. जनता आता महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची सूत्रे जातीयवादी शक्तींच्या हाती देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
1995 साली जनतेने युतीकडे सत्ता सोपविली होती. त्याचे परिणामही जनतेने पाहिले. पुन्हा एकदा 95ची पुनरावृत्ती जनता करणार नाही. ‘अँटी इन्कम्बसी’बाबत जी 
चर्चा चालू आह़ेत्यात काही तथ्य नाही. राज्यात सतत तीनवेळा आणि केंद्रात दोनवेळा आघाडीचे सरकार बनले. यावेळी मोदींच्या खोटय़ा दाव्यांमुळे आणि प्रचारामुळे आघाडी सरकारचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धनगर आरक्षणाची मागणी न्याय्य असल्याचे मान्य करतानाच यातील कायदेशीर अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल आज अनेक होर्डिग्ज् लागल्याचे दिसतायत. पण, हा निर्णय माङया सरकारने घेतला. त्यासाठी राणो समितीची स्थापना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
लोकसभा निवडणुकीत मनसेने पत्करलेल्या शरणागतीमुळे त्यांचे अस्तित्व संपणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसेने आगामी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली नाहीतर त्याचा मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
 
बंड इतिहासजमा
उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या बंडाचा विषय आता इतिहास जमा झाला आहे. निवडणुका माङयाच नेतृत्त्वाखाली लढविल्या जातील. प्रचार प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी राणोंकडे सोपविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम
च्काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी भक्कम आहे. दोन्ही पक्ष आगामी निवडणूक एकत्र लढतील आणि धर्माध शक्तींना रोखतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.  
च्जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आपण तत्परता दाखविली. बिल्डरधार्जिण्या निर्णयांकडे कानाडोळा केल्यामुळेच आपल्यावर संथ कारभाराचा आरोप करण्यात आला. 
च्मेट्रो, मोनो रेल, पूर्व मुक्तवाहिनी, सांताक्रूझ लिंक रोड, 17 उड्डाणपूल,
मिहान, गोसीखुर्द अशी अनेक विकासकामे झाली. जनता त्याची नक्कीच दखल घेईल.