शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासाठी एकात्मिक योजना- सुरेश प्रभू

By admin | Updated: June 4, 2017 14:25 IST

मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 4 - मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू आहे. मराठवाड्यासाठी एकात्मिक योजना तयार करीत आहोत. यातून मराठवाडा रेल्वे मार्गांनी विविध शहरांशी जोडण्यासह प्रलंबबित प्रश्न सुटतील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले.विविध कार्यक्रमांनिमित्त शनिवारी (दि.३) शहरात दाखल झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी खा. रावसाहेब दानवे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे, शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की, निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आपत्ती कोसळते. ही आपत्ती टाळण्यासाठी देशात प्रथमच विमा योजना तयार करण्यात आली. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, यादृष्टीने विविध स्वरूपांतील कामांना सुरुवात झाली आहे. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा, चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी काम करण्यात येत असल्याचे सांगत प्रभूंनी शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे यांच्यातर्फे संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यातून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या वतीने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गाचे ककाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कन्नड घाटात बोगदा तयार करण्यात येत आहे. याच बोगद्यातून दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग नेण्याची मागणी होत आहे. जमिनीचा प्रश्न सुटणार असल्याने याचा विचार करण्यात येईल. देशातील नदी जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले.३ लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूकरेल्वेच्या क्षेत्रात तीन वर्षांत ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक क रण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या बाहेर जाऊन ही गुंतवणूक होत आहे. प्रत्येक दिवशी रेल्वे रूळ निर्माण करण्यात अडीच पट वाढ झाली आहे. आगामी दहा वर्षांत ४१ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विजेची बचत केली जाणार आहे. उद्याची गरज लक्षात घेऊन आजच गुंतवणूक करीत असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. दमरेची पॅचवर्क सारखी स्थितीगेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मध्य रेल्वेतील नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडण्याची मागणी होत आहे. पूर्वी तीन ते चार विभाग होते; परंतु नंतर वाढत गेले. परिणामी, पॅचवर्कसारखी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी योग्य आहे. याचा परिणाम संपूर्ण देशातील झोनवर होईल. त्यामुळे हे क से करता येईल, यासंदर्भात काम सुरू असल्याचे प्रभू म्हणाले.