शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

संस्थानकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 01:22 IST

भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत.

भोर : भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यात झाडे उगवली असून, पुलावरून गाडी गेल्यावर पूल हलतो. या पुलावरून चारचाकी गाडी पडून झालेल्या अपघातात चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. महाड-पंढरपूर रस्त्यावरील आंबेघर येथील नीरा नदीवर संस्थानकाळात हा दगडी पूल १९३५ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यावर राज्यमार्ग असून, कोकणात जाणारा हा एकमेव मार्ग आहे.नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोड व महाड रोडवरील दोन्ही बाजूंकडील लोक याच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनांची सतत गर्दी असते. पुलाच्या बांधकामानंतर ८० वर्षांत कोणत्याच प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.त्यामुळे पुलाचे सरंक्षक कठडे तुटलेले असून, दगडी पिलर खराब झाले आहेत. पुलावरून वाहने गेल्यावर पूल थरथरतो. कठडे खराब असल्याने गेल्या वर्षी पहाटे चारचाकी गाडी पुलाववरून नदीपात्रातील पाण्यात पडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी केली; मात्र चारचाकी ज्या ठिकाणावरून पडली तेथे संरक्षक कठडे न बसवता इतर ठिकाणी कठडे बसविले. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो. ( वार्ताहर)