शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संपूर्ण शेगाव विकासाची जबाबदारी घेण्यास संस्थानचा नकार

By admin | Updated: August 8, 2014 01:06 IST

संत गजानन महाराज संस्थानने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण शेगावच्या विकासाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : ६६ कोटी रुपयांचे योगदान देण्यास असहमतनागपूर : संत गजानन महाराज संस्थानने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण शेगावच्या विकासाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.शासनाने गेल्या १६ जुलै रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून शेगावच्या विकासकामासाठी संस्थानवर ६५ कोटी ५० लाख रुपयांचे योगदान निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली होती. यावर संस्थानने प्रत्युत्तर सादर करून ही रक्कम देण्यास असहमती दर्शविली आहे. भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. संपूर्ण शेगावचा विकास करणे संस्थानची जबाबदारी नाही, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. बाळापूर रोडवर ‘आनंद विहार’ नावाने ९०० खोल्यांची इमारत उभारण्यात येत आहे. गेल्या ४ वर्षांत ३० कोटी रुपये खर्च करून ७५० खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीमुळे रोज ३ हजार भाविकांची राहण्याची व १५०० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे.‘विसावा’ इमारतीतही तीन हजार भाविक राहू शकतात व ५०० वाहने पार्क करता येतात. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नगर परिषदेला ७ कोटी ७५ लाख रुपये दिले आहेत. तसेच, मंदिरालगतच्या मातंग वस्तीच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपये दिले आहेत. परंतु, म्हाडाने घरांचे बांधकामच सुरू केलेले नाही. म्हाडाचे अधिकारी बैठकीत अनुपस्थित असतात. म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे. अन्यथा बांधकामाचा खर्च वाढून भाविकांची देणगी व्यर्थ जाईल, याकडे संस्थानने लक्ष वेधले आहे.संस्थानने स्वत:च्या परिसरात ५० कोटींवर रुपयांची कामे केली आहेत. संस्थानतर्फे संचालित होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदिक औषधालयांवर दरवर्षी एक कोटी रुपये खर्च होतो. वाहतूक व्यवस्थेवर दरवर्षी दोन कोटी रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या ६ जुलै रोजी शासनाला पत्र लिहून खालवाडी येथील १० एकरावरील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली आहे. चार एकरात नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे व सहा एकर जमीन संस्थानला विकासाकरिता देण्यात यावी. या ठिकाणी संस्थान स्व:खर्चाने बहुमजली पार्किंग इमारत व भक्त निवास बांधण्यास तयार आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालयीन मित्र आहेत. (प्रतिनिधी)