शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारे हात - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 10, 2017 05:18 IST

भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली

मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल सुरुच असून, अंधेरी येथे गुरुवारी रात्री झालेल्या सभेत उद्धव यांनी भाजपाला पुन्हा टीकेचे लक्ष्य केले. परिणामी उद्धव यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रत्युत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यावर काय बोलतात? याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.गिरगाव, भांडुप, मुलुंड, चांदिवली येथील सभा गाजवत उद्धव यांच्या तोफांचा मारा सुरुच आहे. भाजपाच्याही सभांतून सेनेला प्रत्युत्तर दिले जाते आहे. परिणामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये रंगलेली जुगलबंदी आणखीच वाढत आहे. अंधेरी येथील सभेत विशाल समुदायाला उद्देशून उद्धव म्हणाले, भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करते. भाजपवर टीका करताना मुंबईकरांना मान खाली घालायला लावेल, असे एकही काम शिवसेनेने केलेले नाही. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात महापालिकेतील कामांचा उल्लेख केला आहे, बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख मुद्दाम केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘चिक्की किती आणि कोण खातंय हे लोकांना कळू द्या...’ असे म्हणत अप्रत्यक्षरित्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.भाजपवर टीका करतानाच उद्धव यांनी युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता, असेही वक्तव्य करत गुंडांना पक्ष प्रवेश देणाऱ्या भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांविरोधात शिवसेना सदैव उभी असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या अंधेरीतील भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी रत्नागिरी येथे अपघातात मृत्यू झालेल्या सात शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.