शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लघुउद्योगांची ‘इन्स्पेक्टर राज’मधून मुक्ती

By admin | Updated: December 1, 2015 01:20 IST

राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही.

मुंबई : राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही. विजेचा वापर न करणाऱ्या आणि १०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांनाच आतापर्यंत परवाने घ्यावे लागत नसत. आता नवीन दुरुस्तीनुसार वीजवापर न करणाऱ्या आणि २०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांना परवान्याची गरज नसेल. तसेच, आतापर्यंत वीजवापर करणाऱ्या आणि २०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांनाच परवाने घ्यावे लागत नसत. आता या उद्योगांमध्ये ४०पेक्षा कमी कामगार असले तर परवान्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांतील जवळपास १४ हजार ४०० उद्योगांची इन्स्पेक्टर राजमधून मुक्तता होणार आहे. असे असले तरी कामगार कायद्यातील कामगार हितविषयक बाबींची अंमलबजावणी करणे मात्र या दोन्ही प्रकारच्या उद्योगांसाठी अनिवार्य असेल. तसे केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कामगार विभागाला असेल. कारखाना अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाने मे २०१५मध्ये मंजुरी दिली होती. (विशेष प्रतिनिधी)महिलांच्या रात्रपाळीलासशर्त परवानगीमहिला कर्मचाऱ्यांना कारखान्यांमध्ये रात्रपाळीमध्ये बोलविता येईल; पण त्यासाठी विशिष्ट अटींचे पालन या दुरुस्तीनुसार कारखाना मालकांना करावे लागेल. महिला कर्मचारी आता सायंकाळी ७ ते पहाटे ६ या वेळेत कारखान्यांमध्ये काम करू शकतील. अर्थात, त्यासाठी त्यांची संमती लागेल. त्यांना रात्रपाळीत सुरक्षा, रात्री कामावर येताना आणि परतताना वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेसह सोय करावी लागेल. तसेच, कारखान्याच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीची सोय करावी लागेल. आतापर्यंत महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळीत बोलवायचे तर कामगार विभागाची परवानगी घ्यावी लागत असे.