शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 9, 2017 03:24 IST

पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील प्रभागांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली. यावेळी नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्यास घेराव घातला. उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यास नगरसेविका प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, सुनीता पाटील, दमयंती वझे, जालिंदर पाटील, विनोद काळण, रविना माळी, शैलजा भोईर, मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे आदी नगरसेवकांनी एमआयडीसीच्या कार्यालयास धडक दिली. पाणी कमी दाबाने येत असल्याचा जाब विचारत त्यांनी कार्यकारी अभियंते एस. एस. ननावरे यांना घेराव घातला. उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, २७ गावांना एमआयडीसीकडून यापूर्वी दररोज ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने २७ गावांचा पाण्याचा कोटा वाढवण्यात आला. वाढीव कोट्यानुसार २७ गावांना जवळपास ५५ दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवले जाते. तरीही २७ गावांतील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी कोणत्या गावात किती दाबाने व किती पुरविले जाते, याच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. पिसवली येथे वॉल बसवला आहे. मात्र, तेथे दीड किलोच्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात अर्धा किलो दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात पुरेशा दाबाने पाणी मिळते. काही भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही. ही असमान पाणी वाटपाची स्थिती का आली आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला. पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी गतवर्षी महापालिकेने पाच कोटी रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. तसेच पाणी पुरवठ्यासाठी भरावी लागणारी दोन कोटी ४२ लाख रुपये ही अनामत रक्कमही महापालिकेने यंदाच्या वर्षी एमआयडीसीला भरली आहे. याशिवाय दरमहा पाणी पुरवठ्याचे ८० लाख रुपयांचे बिल भरण्याची हमी दिली आहे. पालिकेकडून बिलाचा प्रश्न निकाली निघाला आहे. बिल भरूनही गावांना पाणी मिळत नाही. पाण्याचा कोटाही वाढवला आहे. नेमका कुठे दोष आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शनिवारी २७ गावांतील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व एमआयडीसी पाहणी करून नक्की काय दोष आहे, याचा शोध घेणार आहेत. पाणीपुरवठा कमी दाबाने का होतो, हे तपासले जाणार आहे. टाटा नाका व कोळेगाव येथे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. ही ठिकाणी शनिवारी पाहिली जाणार आहेत. >उद्या पाहणी करून दोष शोधणार२७ गावे आणि एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यातील दोष शनिवारी पाहणी करून शोधला जाणार आहे. नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला घेराव घातला. तेव्हा महापालिकेचे अधिकारी त्याठिकाणी चर्चेसाठी आलेले नसल्याने याविषयी उपमहापौर भोईर यांनी नाराजी व्यक्त केली, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ननावरे यांनी सांगितले.