शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

दोषारोप निश्चित न करताच चौकशी पूर्ण!

By admin | Updated: December 22, 2016 04:07 IST

औषध खरेदीप्रकरणी निलंबित केलेल्या ४ अधिकाऱ्यांपैकी, प्रत्येकाविरुद्ध नेमके कोणते दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत? अशी

अतुल कुलकर्णी / मुंबईऔषध खरेदीप्रकरणी निलंबित केलेल्या ४ अधिकाऱ्यांपैकी, प्रत्येकाविरुद्ध नेमके कोणते दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत? अशी विचारणा करूनही दोषारोप निश्चित करण्याचे काम अजून झालेले नाही, असे मला सांगण्यात आले. ते का झाले नाही, असे विचारले असता, त्याबद्दल आपल्याला काहीही सांगण्यात आले नाही आणि त्याचे कारणही आपल्याला समजले नाही, अशी विदारक स्थिती अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी चौकशी अहवालात नमूद केली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या २९७ कोटी रुपयांच्या औषध खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला होता. त्यानंतर, डॉ. सहाय यांची चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांच्या अहवालात अनेक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.औषध खरेदी ही आरोग्य संचालनालयातील संस्थांसाठी असो किंवा नगर परिषदा, महापालिकांसाठी असो, त्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाचीच आहे, असे ठाम मत नोंदवून, सहाय समिती पुढे म्हणते, ‘ही खरेदी शहरी आरोग्य अभियानाकरिता आहे, त्याचा आमच्याशी संबंध नाही, असे म्हणून कोणीही त्यातून पळ काढू शकत नाही. खरेदी प्रक्रियेची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य संचालनालय आणि संचालनालयाचे औषध खरेदी कक्ष या तिघांचीही आहे.’ सहाय पुढे असेही म्हणतात की, ‘शहरी आरोग्य अभियान कक्षाकडून मागणी प्राप्त झाल्यानंतर, त्याची छाननी कशी करायची, याचे मार्गदर्शन महापालिका व नगरपरिषदांना आरोग्य विभागाने करणे अपेक्षितच आहे. तसे केले नसेल, तर ती आरोग्य विभागाच्या कामातील मोठी चूक आहे.’ ‘कॅल्शियम फॉस्फेट सीरपची बाजारात किंमत ६५ रुपये असताना, तीच बाटली १८ रुपये प्रती दराने खरेदी करण्यात आली, असे आपल्याला सांगण्यात आले, पण ही बाब विश्वासार्ह वाटत नाही. कारण बाजारभाव आणि निविदेतील किमतीत खूप तफावत आहे. एवढे कमी दर निविदेत का आले, याचे कारण समजत नाही. मात्र, या सगळ्याची समितीने अधिक चौकशी केली असता, टेंडर पद्धतीचेच उल्लंघन झाल्याचे समोर आले. एकदा संख्या करार केल्यानंतर पुन्हा परत आॅर्डर देता येत नाही. असे असतानाही आरोग्य संचालनालयाने ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४० कोटींची आॅर्डर देऊन, शासनाच्या टेंडर प्रक्रियेचेच उल्लंघन केले,’ असेही डॉ. सहाय यांनी म्हटले आहे.