शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

वाशिम स्वच्छ-सुंदर व हिरवेगार करण्याचा अभिनव संकल्प

By admin | Updated: July 8, 2017 07:34 IST

५०१ झाडे लावून संवर्धन करण्याची शपथ : युवकांचा सहभाग

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 -  पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे जाणून जिल्ह्यातील राजरत्न व अण्णाभाऊ साठे संस्थेने शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याचा अभिनव संकल्प घेतला असून कार्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या या संकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
पर्यावरण अबाधित राखण्याकरिता वृक्ष लागवड करुन जतन व वृक्ष संवर्धनाचा संदेश देत शासनाच्या हाकेला साद देत जिल्हयात समाजकार्याचा वसा जोपासत ५०१ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. ५०१ वृक्ष लागवड करीत सुंदर वाशिम, स्वच्छ वाशिम व हिरवेगार वाशिम करण्याचा संकल्प करीत पहिल्या टप्प्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अण्णाभाऊ साठे बहुउदेशिय कला, क्रीडा व शिक्षण संस्था रिठद, राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहुउदेशिय संस्था वाशिमच्या सहयोगाने वृक्ष लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 
 
यावेळी विशेषत: वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग वाशिमचे वनअधिकारी नांदुरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.  या संस्थेच्या वतीने केवळ वृक्षारोपण करुन शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार बनविण्याचा संकल्पच केला नसून सोबतच वृक्ष लागवड कशी करावी, जतन , संवर्धन, वृक्षापासून होणरे फायदे नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भविष्यातील पिढीसाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यदेखील केले जात आहे. यासाठी तालुका क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, विनोद पट्टेबहादूर, भारत गवळी, विनोद जवळकर, कलीम मिर्झा, महादेव क्षिरसागर, जयंतकुमार इंगोले, रत्नशोभीत अंभोरे, अरविंद उचित, दत्तराव वानखडे, संदिप राऊत, अनिल थडकर, शेख जमिर, सत्येंद्र भगत सहकार्य करीत आहेत.
 
शासनाच्यावतीने वृक्ष लावण्याबाबत जनजागृती केल्या जात आहे. याला प्रभावित होवून सर्वाधिक युवकांचा समावेश असलेल्या सदर संस्थेतील पदाधिकारी, सदस्यांनी काही तरी वेगळे करण्याचा मानस व्यक्त केला. त्यातून हा उपक्रम पुढे आला असल्याने सर्वांनी संकल्प केला.
 
सर्वांचेच योगदान  
वृक्षरोपण करणे सोपे आहे परंतु त्याचे संगोपन करणे कठीण आहे. संस्थेच्यावतीने सकल्प घेण्यात आला तेव्हा सर्वांना याची जाण करुन देण्यात आली. परंतु आपल्या हातून चांगले कार्य घडत आहे म्हणून सर्वांनी होकार देत हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांचे यात चांगले योगदान लाभत आहे. - भगवान ढोले, विनोद पट्टेबहादूर