शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पीक कर्जासाठी अभिनव आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 16:51 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, दि. 15 - तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.गेल्या १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ त्यामुळे अरेरावी, मनमानीपणे वागून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व कायदेशीर कारवाई करून त्यांना शासन व्हावे अन्यथा १० दिवसानंतर हतबल व पीडित शेतकरी अर्धनग्न उपोषणास बसतील, असा इशारा येथील तहसिलदारांना यापूर्वी म्हणजे ५ जुलैला देण्यात आला होता़या संदर्भात निवेदन देवून ९ दिवस उलटले तरी शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आजतागायत अरेरावीने व मनमानी कारभार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले नाहीत, तसेच पीडित शेतकऱ्यांच्या निवेदनाची साधी दखल सुध्दा घेतलेली नाही़ गेल्या ३-४ वर्षापासून सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे़ अशाही परिस्थितीत खचून न जाता परिस्थितीशी सामना करीत मागील नुकसान सहन करून पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी पीक पेरणी, बियाणे खरेदी, पाईपलाईन, बोअरवेल, फवारणी, औषधी, खते, वीज पुरवठा, यांत्रिकी व मजुरी याकरीता शेतकऱ्यांना आर्थिक निकड निर्माण झाली आहे़बँकांमध्ये शेतकरी पीक कर्जासाठी जावूनही संबंधित अधिकारी दाद देत नाहीत, अरेरावीने वागतात, आम्ही पीक कर्ज देत नाही, साहेब नाहीत, नंतर या, बँकेचा कोटा पूर्ण झाला, तुमचे क्षेत्र आमच्या बँकेच्या अंतर्गत येत नाही, आदिवासींना पीक कर्ज देता नाही, जुन्या ग्राहकास फक्त कर्ज देतो, तेही सध्या बंद आहे, बँकेचे आॅडिट सुरू आहे, एका महिन्यानंतर या अशी एक ना हजार कारणे सांगून पीक कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची बॅँक अधिकाऱ्यांकडून बोळवण केली जात आहे़ त्यामुळे शेतकरी हतबल ठरले आहेत.शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना जाहीर कराव्या, मात्र ज्यांच्या मार्फत त्या राबविल्या जातात त्या बँकांच्या उदासिनतेचा परिणाम म्हणून शेतकरी त्या पासून आजही वंचित राहिलेला आहे़ अखेर हतबल शेतकऱ्यास सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे़ परिणामी सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशीवेळ शेतकऱ्यांवर येवू नये म्हणून झोपेचे सोंग घेणाऱ्या संवेदनाहीन बॅँक अधिकारी व शासनास जागे करण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.गेल्या नऊ दिवसांत काही हालचाल न झाल्याने येथील तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले़ या आंदोलनाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरतसिंग राजपूत, शहरप्रमुख कन्हैय्या राजपूत, शिरपूर विकास आघाडीचे चंदनसिंग राजपूत, निलेश गरूड, मनसेचे मयूर राजपूत, स्वप्नील जाधव यांच्यासह बहुतांश कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.