शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार हवा

By admin | Updated: April 29, 2016 01:48 IST

एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

देऊळगावराजे : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दुष्काळाचा सामना करणे काळाची गरज असून, एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.दौंड शुगर व एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव (ता. दौंड) येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. एन्हॉर्यमेंटल फोरमची स्थापना गेली सहा वर्षांपूर्वी झाली. ओढे रुंदीकरणाचे काम करताना ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे या पुढील काळात पाणीबचतीचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.या वेळी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, दौंड शुगर व एन्हॉर्यमेंटल फोरमच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव या गावांचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम करण्यात आले. दौंड शुगरच्या माध्यमातून ड्रीपसारख्या योजना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या वेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियोजन केले पाहिजे. भाजपाचे नेते वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे या मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्या मनीषा लव्हे, बोरीबेलच्या सरपंच हिराबाई आटोळे, उपसंरपच दत्ता पाचपुते, दत्ता खळदकर, रमेश पाचपुते, माऊली चव्हाण, हनुमंत पाचपुते, उत्तम आटोळे, शरद सूर्यवंशी, पिंटू पाचपुते, माऊली कापसे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.>बोरीबेल व आलेगाव येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामांचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष महत्त्वाचावासुदेव काळे म्हणाले की, कालचा दौंड तालुका बागायती होता. आता त्याची वाटचाल जिरायती भागाकडे सुरू झाली आहे. तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी आणि दुष्काळ निवारण्यासाठी सर्र्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. कार्यक्रम वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. मात्र कार्यक्रम कोणाचा आहे, याचा विचार न करता हिताचा हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून उपस्थितीत राहिलो आहे, अशीच भावना सर्व राजकीय पक्षांनी दुष्काळ निवारणासाठी केली पाहिजे.