शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाणीबचत करण्यासाठी सोसायट्यांचा पुढाकार

By admin | Updated: May 20, 2016 02:44 IST

सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे.

अपर्णा जगताप,

मुंबई- राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील हायवे दर्शन सोसायटीने अनोखी उपाययोजना केली. या सोसायटीचे सचिव प्रशांत वाढीवकर यांनी दोन्ही इमारतींतील सगळ्या घरांमधील गळतीची तपासणी करून ते दुरुस्त करून घेतले. दिवसभर पाणी वापरण्याऐवजी दुपारी २.३० ते सायं. ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे महानगरपालिकेकडून पाणी कमी आल्यास या साठ्याचा उपयोग सोसायटीला होऊ लागला आहे. आठवड्यातून एकदाच गाड्या धुण्याचे आवाहन सभासदांना करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीबचत होत आहे. बोअरिंगचे पाणी झाडांसाठी वापरण्यात येते. सोसायटीच्या आवारात वापरासाठी बसवण्यात आलेल्या ३ नळांपैकी २ नळांचे कनेक्शन गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही अतिरिक्त पाणी वापर कमी झाल्याचे वाढीवकर यांनी सांगितले. ‘गरजेपुरता पाण्याचा वापर’ असा संदेश या सोसायटीकडून दिला जात आहे. चुनाभट्टीतील गिरीश अपार्टमेंट आणि ठाण्यातील साकेत अपार्टमेंट यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या दिवसभर पाणी सोडण्याऐवजी फक्त अर्धा तासच पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे सर्व सभासद या उपक्रमाला साथ देत आहेत. कमी पाण्यात अधिकाधिक दैनंदिन कामे करण्याकडे या दोन्ही सोसायट्यांचा कल आहे.