इंदापूर : पहिल्या दोन मुलीच झाल्या. तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंगचिकित्सा करण्याच्या पतीच्या मागणीस नकार दिल्याने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीचा अमानुष जाच केला. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणा:या पतीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात आज (दि. 1 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी प्रकारात जन्माला येण्यापूर्वीच अपत्य तिच्या पोटातच दगावले.
या प्रकरणी विलास लक्ष्मण ठवरे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अश्विनी विलास ठवरे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी तिचे वडील धनाजी सिताराम मारकड (रा. कौठळी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. मुलीसह तिच्या पोटातील गर्भ देखील दगावला असल्याने या प्रकरणी कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
चार वर्षापूर्वी अश्विनी यांचा विवाह विलास ठवरे याच्याबरोबर झाला. विवाहानंतर दोन मुली झाल्या. तिस:यांदा मुलगी नको म्हणून त्याने सतत गर्भलिंग चिकित्सा करण्याचा आग्रह धरला. दीड महिन्यापूर्वी विलास याने तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. तिथे गर्भलिंग तपासणी करायची आहे. मुलीचा गर्भ असेल तर तो खाली करायचा आहे. तसेच, विहिरीसाठी 1 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती. 1 लाख रुपये देण्यास व गर्भलिंग तपासणी करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे पत्नी अश्विनी हिला माहेरी सोडून निघून गेला.
तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंग तपासणी करावी, असा आग्रह आहे. मुलीचा गर्भ असल्यास पती छळ करतो. त्याच्याकडून होणारा त्रस असह्य आहे. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा पाठवू नका. ते जिवंत सोडणार नाही, असे अश्विनी हिने वडील धनाजी मारकड यांना सांगितले. मात्र, तिची समजूत घालून नांदण्यास पाठविले. त्या नंतर 31 ऑगस्ट रोजी पुतण्या दयानंद मारकड याने अश्विनी आजारी आहे. तिला दवाखान्यात दाखल केले आहे, असे सांगितले. त्यानंतर वडील व अन्य कुटुंब इंदापूरला गेले. दवाखान्यात विलास ठवरे याने भांडण करून त्रस दिल्याने विषारी औषध घेतल्याचे तिने सांगितले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अश्विनीच्या पहिल्या दोन मुलींचे वय अनुक्रमे 2, 1 वर्ष आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस कर्मचारी दीपक पालके, अमित यादव तपास करीत आहेत. (वार्ताहर)
अश्विनीचे वडील धनाजी मारकड यांना 6 मुली आहेत. त्यांतील थोरल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अश्विनीचा पतीच्या छळामुळे मृत्यू झाल्याने त्यांना धक्का बसला.