शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ट्रेन घसरणीच्या घटना रोखणार ‘इन्फ्रारेड कॅमेरे’

By admin | Updated: October 21, 2016 03:01 IST

रुळावरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखतानाच रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नव्या अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे. सिग्नल किंवा रुळांजवळ

मुंबई : रुळावरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखतानाच रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नव्या अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे. सिग्नल किंवा रुळांजवळ ‘इन्फ्रारेड कॅमेरे’ बसविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला देण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई हद्दीतील पाच ठिकाणी असे कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांद्वारे अपघातांचे नेमके कारणही समजण्यास मदत होईल. रुळांवरून सतत ट्रेन जात असल्याने होणाऱ्या घर्षणामुळे चाके गरम होतात. तसे रूळही गरम होतात. त्यातूनच तापमानात सातत्याने होणारे बदल यामुळे रुळाला तडे जाण्याच्या घटना घडतात आणि ट्रेन रुळावरून घसरण्याच्या घटनाही होतात. मध्य रेल्वेवर सातत्याने अशा घटना घडत असल्याची बाब निदर्शनास आली. त्याची दखल घेत रुळांवरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखता याव्यात यासाठी नव्या यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले. त्यानुसार सिग्नल यंत्रणा तसेच रुळांजवळ किंवा महत्त्वाच्या यार्ड येथे इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, माझगाव येथील यार्डमध्ये आणि कुर्ला व कळवा कारशेडमध्ये बसविण्याचा विचार मध्य रेल्वेतर्फे सुरू आहे. त्यासाठी ५0 लाख रुपयांपर्यंत खर्च येणार असून, महाव्यवस्थापकांना तसे अधिकारही रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत.या कॅमेऱ्यांमध्ये उष्ण गोष्टी लाल-पिवळ्या आणि थंड गोष्टी निळ्या रंगात दर्शविल्या जातानाच ट्रेनचे चाक तसेच रूळ ठरावीक तापमानापेक्षा अधिक गरम झाल्यास त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्ष किंवा ट्रेन मॅनेजमेंट आॅयंत्रणेला कॅमेऱ्यांद्वारे पोहोचवता येणे शक्य होणार आहे. तसेच घटनेच्या ठिकाणाची छायाचित्रेही या कॅमेऱ्यात साठवून ठेवता येतील. (प्रतिनिधी)