शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकटक बघणाऱ्याला हटकलं म्हणून 'इन्फोसिस'च्या इंजिनिअरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 12:25 IST

हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीतील महिला इंजिनिअरची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - एकटक बघणाऱ्याला जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला राजू ओपी हिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  आरोपी सुरक्षा रक्षकानं स्वत:च पोलिसांकडं तशी कबुली दिली. हत्या करून आसाममध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हिंजवडी पोलिसांनी आज पहाटे मुंबईहून त्याला अटक केली.
(आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!)
इन्फोसिस कंपनीच्या हिंजवडी फेज 2 मधील कार्यालयात रविवारी सायंकाळी कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिला ओपी हिची हत्या करण्यात आली. ही घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने हालचाली करून बबन नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन हा इन्फोसिस कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तर, रसिला राजू ओपी (वय वर्षे 24 ) ही त्याच कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करीत होती.
 
बबनला एसडीबी 10 या इमारतीच्या नवव्या मजल्यावर ड्युटी लागली होती. रविवार असल्यामुळे या मजल्यावर कमी कर्मचारी होते. ही संधी साधून बबन रसिलाकडे एकटक नजरेने पाहत होता. त्यावरून रसिलानं त्याला 'असे काय पाहतो' म्हणत हटकले. ई मेलवरून तुझी तक्रार करते आणि नोकरी घालवते, असे म्हणून ती आत गेली; तेव्हा तो तिच्या पाठोपाठ मिटिंगरूममध्ये गेला. तिची माफी मागितली आणि कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिलाची हत्या केला. त्यानंतर बबनने तेथून पळ काढला.
 
मूळगावी आसामला जाण्यासाठी तो मुंबईला गेला. दरम्यान, रसिला हिचा संपर्क होत नसल्याचे तिच्या वरिष्ठांनी कंपनीत कळवले होते. कंपनीतील अन्य सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला असता रसिलाची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच कंपनीतील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बबनला मुंबई येथून पहाटे अटक करण्यात आली.