शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

राज्यात महागाई झाली दुप्पट

By admin | Updated: June 5, 2014 01:30 IST

राज्याच्या राजधानीत, मुंबईत दरडोई उत्पन्न 1,67,736 रुपये असले तरी याच ठिकाणी 6क् टक्के लोक अजूनही झोपडपट्टीत राहत आहेत.

अतुल कुलकर्णी - मुंबई
राज्यातल्या 35 जिल्ह्यांपैकी अवघ्या सहा जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न 1 लाखाच्या वरती आहे तर 12 जिल्हे अजूनही 5क् ते 65 हजारांतच अडकलेले आहेत. राज्याच्या राजधानीत, मुंबईत दरडोई उत्पन्न 1,67,736 रुपये असले तरी याच ठिकाणी 6क् टक्के लोक अजूनही झोपडपट्टीत राहत आहेत. श्रीमंत आणखी श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब झाल्याचे विदारक वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेले आहे.
राज्याचा समान विकास व्हावा, या संकल्पनेला देखील यातून हरताळ फासला गेला आहे. काही जिल्हे व त्यातही काही कुटुंबे प्रचंड श्रीमंत झाली, तर दुसरीकडे लोकांना राहण्यासाठी चांगले घरही उपलब्ध नाही. मुंबई, ठाणो, पुणो, रायगड या चार जिल्ह्यांच्या टापूतच दरडोई उत्पन्नही वाढले आणि बकालपणा देखील. याच चार जिल्ह्यांत विधानसभेच्या 68 जागा आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवूृन या चार जिल्ह्यांसह नाशिक आणि कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केले गेले. पर्यायाने राज्यातल्या बाकी जिल्ह्यांचा विकास पूर्णत: ठप्प झाल्यात जमा आहे. 
राज्यातल्या जिल्ह्याजिल्ह्यातच टोकाची विषमता निर्माण झाल्याचे चित्र देखील याच आर्थिक पाहणीतून पुढे आले आहे. देशाचे दरडोई उत्पन्न 67,839 रुपये आहे. या उत्पन्नापेक्षाही राज्यातील नंदूरबार, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, गडचिरोली, नांदेड, परभणी, गोंदिया, यवतमाळ आणि भंडारा या 12 जिल्ह्यांचे कमी उत्पन्न आहे. 
राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्राचा दुसरा नंबर आला असला तरीही राज्यातच टोकाची विषमता यातून समोर आलेली आहे. 2क्11 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी झाली आह़े त्यातले 2 कोटी 62 लाख लोक आजही झोपडपट्टीत राहत आहेत. सरकारने एसआरएसारख्या योजना आणल्या. त्यातून सव्वा लाख लोकांना घरे दिली़ असे जरी असले तरी आजही एकूण लोकसंख्येच्या 23.32 टक्के लोक झोपडपट्टीतच आहेत.
सगळ्याच जिल्ह्यांचा समान विकास झाला असता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते, पण आजमितीला अनेक जिल्हे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होतानाचे चित्र दिसत नाही. ठराविक जिल्हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लक्ष्य करायचे आणि राजकीय हेतू साध्य करायच़े यामुळे राज्य असमान विकासाच्या उंबरठय़ावर येऊन उभे आहे. 
देशाच्या दरडोई उत्पन्नार्पयतही पोहोचू न शकलेल्या 12 जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे.
दुसरीकडे महागाई दुपटीने वाढल्याचेही हा अहवाल सांगतो आहे. खाद्यपदार्थाच्या किमती एप्रिल 2क्13 मध्ये 6.1 टक्क्यांवर असलेल्या महागाईने नोव्हेंबर 2क्13 मध्ये 19.7 टक्क्यावर मजल मारली होती. जी डिसेंबर 2क्13 मध्ये 13.7 टक्क्यांवर आली. 
महागाई वाढत असतानाही ग्रामीण भागाचा विकासदर मात्र 9.7 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर गेला आहे. याचाच अर्थ झालेला विकास हा  समन्यायी नाही.