शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

मंगळवारपासून उद्योग बेमुदत बंद

By admin | Updated: January 9, 2015 00:27 IST

दक्षिण महाराष्ट्र : वीजदरवाढीच्या विरोधात उद्योजकांचा निर्णय

सतीश पाटील -शिरोली  - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ४० टक्के वीजदरवाढ केल्याने ती उद्योजकांना परवडणारी नाही. त्यामुळे तोट्यात धंदा करण्यापेक्षा उद्योगच बंद करूया म्हणून वीजदरवाढीच्या विरोधात मंगळवार (दि. १३) पासून कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील सर्व फौंड्री व इतर उद्योग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला असल्याचे उद्योजकांनी आज, गुरुवारी सांगितले.महाराष्ट्र विद्युत निर्मिती व विद्युत पारेषण यांच्या तांत्रिक गळतीचा फटका महावितरणला पर्यायाने ग्राहकांना बसत आहे. अतिरिक्त भाराच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला ९०० कोटी रुपयांची वसुली सुरू असतानाच भाजप-सेना सरकारने २७ टक्के जादा वीजदराचा आणखी एक मोठा शॉक दिला आहे. यामुळे तब्बल ४० टक्के जादा दराने वीज आकारणी होणार आहे.गेली दोन वर्षे राज्यातील उद्योजक वीजदरवाढ कमी करण्याची मागणी आघाडी शासनाकडे करीत होते; पण ही वीजदरवाढ कमी झाली नाही. भाजप-सेना युतीने निवडणुकीच्या काळात वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यावर युती सरकारने वीजदरवाढ कमी करण्याऐवजी वाढविली. यामुळे सर्वसामान्य जनता भरडून निघणार आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र, छत्तीसगड या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत. हे उद्योजकांना न परवडणारे असल्याने उद्योजक परराज्यांत चालले आहेत. या उद्योजकांना थांबविण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना-भाजपच्या आमदारांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोल्हापूरला बोलविले, बैठकही झाली; पण यात कोणतेही निर्णय झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापूरला आले होते; पण त्यांनीही यावर काही निर्णय दिलाच नाही. त्यामुळे उद्योजक नाराज झालेत; पण पुन्हा युती शासनाने २० टक्के वीजदरवाढ केल्याने उद्योग चालविणे शक्य नाही. मोठ्या उद्योगांना १२.५० पैसे प्रतियुनिट आणि लघु उद्योगांना १४ रुपये प्रतियुनिटने वीज आकारणी होणार आहे. त्यामुळे उद्योग बंद ठेवलेलेच बरे आहे, या निर्णयाप्रत उद्योजक येऊन, मंगळवारपासून कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व फौंड्री उद्योग व लघु उद्योग बेमुदत बंद राहणार आहेत, असे उद्योजकांनी सांगितले. दरवाढ न परवडणारीशासनाने पुन्हा २० टक्के वीजदरवाढ केल्याने उद्योग चालविण्यापेक्षा बंद ठेवलेले बरे. उद्योगांना ही दरवाढ न परवडणारी आहे. त्यामुळे उद्योग बेमुदत बंद ठेवणे हाच पर्याय आहे, तरच शासनाचे डोळे उघडतील.- उदय दुधाणे, उद्योजकएवढ्या दरवाढीमुळे फौंड्री उद्योग चालूच शकत नाहीत. उत्पादन सुरू ठेवून उद्योजकांना तोटा होणार. त्यामुळे फौंड्री उद्योग बंद राहिले, तर त्यावर आधारित पाच हजार लघुउद्योगही बंद राहून बेरोजगारी वाढणार आहे. - राजू पाटील, उपाध्यक्ष, स्मॅक