शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवारपासून बंद

By admin | Updated: January 10, 2015 00:28 IST

उद्योजकांचा निर्णय

कोल्हापूर :सरकारने अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ आणि अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर खाली येईपर्यंत नवीन दरवाढ करू नये या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवार (दि. १२) पासून तीन दिवस बंद राहणार आहेत. याबाबतचा निर्णय उद्योजकांनी आज, शुक्रवारी घेतला. उद्योग बंद राहिल्याने जिल्ह्यातील ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, महावितरणला शंभर कोटींच्या महसुलाला मुकावे लागण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.यावेळी वीजग्राहक व औद्योगिक संघटनेचे निमंत्रक प्रताप होगाडे, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष अजित आजरी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फौंड्रीमेनचे (आयआयएफ) अध्यक्ष विलास जाधव, इचलकरंजीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयलचे अध्यक्ष शामसुंदर मर्दा प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरकारने अनुदान देऊनही राज्यातील विजेचे दर सव्वा रुपयाने जादा आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ३५ टक्क्यांची केलेली दरवाढ उद्योगांना मारक ठरणारी आहे. त्यामुळे या अन्यायकारक दरवाढीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची आज बैठक झाली.