शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

उद्योगपती-सिनेतारे आणून विकास होत नाही -अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 14:30 IST

काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले

नाशिक : काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले. मात्र ज्या नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात महापालिका दिली, त्या नाशिककरांची मनसेने निराशाच केली, तारे-तारका आणून विकास होत नाही,अशी बोचरी टीकाही अजित पवार यांनी मनसेवर केली.गेल्या पाच वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. तेथे पक्षाने काय कामे केली, हे राज्यभरातून जनतेने जाऊन पाहावी. आम्ही पाच वर्षात केवळ विकास केला. उद्याने रस्ते सर्वच क्षेत्रात विकास केला. आम्ही करून दाखविले. मात्र नाशिकला ज्या मनसेच्या ताब्यात नाशिककरांनी सत्ता दिली. त्यांची मनसेने निराशाच केली. पाच वर्षात काही केले नाही, आता चित्रपटातील तारे-तारका आणून त्यांना नाशिकची कामे दाखविली जात आहे. नाशिककरांना मात्र हे अजूनही समजलेले नाही. मनसेने नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली होती. मात्र ती पूर्ण करता आली नाही. पुण्यातही भाजपा-शिवसेनेने पुणेकरांना अनेक आश्वासने दिली मात्र अडीच वर्षात त्यांना ती एकही पूर्ण करता आलेली नाही. फक्त निवडणुका आल्या की ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तो कोवळ ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगायचे. अच्छे दिनबाबत तर भाजपाचेच काही लोक ती आमच्या गळ्यातील हड्डी बनल्याचे सांगत आहेत. पाच वर्षात जनतेचा केवळ भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच मनसेचे आमदार-खासदार निवडणुकीत जिंकल्याचे दिसले नाहीत.