शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहती वगळण्याची विनंती

By admin | Updated: April 3, 2017 01:16 IST

वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़

पुणे : डॉ़ कस्तुरीरंगन समितीने, पश्चिम घाट हा पर्यावरण क्षेत्र तयार करण्यासाठी केलेल्या शिफारसींमुळे औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन विकासाला खीळ बसणार असेल तर या वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़ अ‍ॅड़ जयदेवराव गायकवाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली़ महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती या लक्षवेधीतून दिल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ अ‍ॅड़ गायकवाड म्हणाले, की डॉ़ माधव गाडगीळ आणि डॉ़ कस्तुरीरंगन समितीने देशभरातील ५६ हजार ८२५ वर्ग किलोमीटर एवढा भाग हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला आहे़ त्यात रोहा, नागोठणे अशा एकूण राजगड व कोल्हापूर भागातील एकूण १५ औद्योगिक वसाहतींचा समावेश हा पर्यावरण संवेदनशील भागात झाला आहे़ त्यामुळे हे उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे़ केंद्र सरकारच्या २८ फेबु्रवारी २०१७ च्या गॅझेटनुसार ६० दिवसांच्या आत हरकती नोंदविणे गरजेचे आहे़ मात्र हरकती न नोंदविल्यास हे उद्योग बंद पडणार आहेत़ त्यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत मांडण्यात आली होती.केंद्र सरकारचे औद्योगिक क्षेत्रातील समस्येकडे लक्ष वेधण्यचा प्रयत्न केल्याचे अ‍ॅड. गायकवाड म्हणाले.