शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था

By admin | Updated: July 17, 2017 14:20 IST

मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे. यामुळेच राज्य सरकारने मधूर भांडारकरांना सुरक्षा पुरवली आहे. शनिवारी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली होती. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोन वेगवेगळया ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला होता.
 
संबंधित बातम्या
मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?
हा तर कॉंग्रेसचा वाह्यातपणा, मधुर भांडारकर
माझं तोंड काळं केल्यानं इतिहास बदलणार नाही : मधुर भांडारकर
पुणे - "इंदू सरकार" चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
 
चित्रपटाला होणारा विरोध आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची तीव्र आंदोलनं लक्षात घेत राज्य सरकारने मधूर भांडारकर यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.  28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल.
 
राहुल गांधींकडे व्यक्त केला संताप
आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?’ असा थेट सवाल केला.
 
चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भूमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने ‘स्पॉन्सर’ केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणुकांच्या वेळी प्रदर्शित केला असता, असे भांडारकर यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांनी बोलताना सांगितले.
 
‘सेन्सॉर’ने या चित्रपटात १७ ‘कट’ करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ‘ट्रिब्युनल’मध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहिले आहे, असे विचारत नाहीत. मग चित्रपटाबाबतच का विचारणा होते, असा सवालही भांडारकर यांनी उपस्थित केला.
 
"हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल, तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझे तोंड काळे करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही", असं मधूर भांडारकर बोलले आहेत.