शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

इंद्रायणी स्वच्छतेचा विसर

By admin | Updated: May 21, 2016 01:40 IST

पावसाळा १५ दिवसांवर आलेला असताना शहरात इंद्रायणी नदीपात्र आजही जलपर्णीने भरलेले आहे.

लोणावळा : पावसाळा १५ दिवसांवर आलेला असताना शहरात इंद्रायणी नदीपात्र आजही जलपर्णीने भरलेले आहे. इंद्रायणी स्वच्छ करण्याचा लोणावळा नगर परिषदेला विसर पडला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्यांमधील एक असलेल्या इंद्रायणीचा उगम लोणावळा शहरात आहे. नदीचे पात्र हे लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने हे नदीपात्र स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही लोणावळा नगर परिषद व पाटबंधारे विभागाची आहे. मात्र, शासनाचे हे दोन्ही विभाग हे त्या संदर्भात काम करण्यात अपयशी ठरले आहेत. दर वर्षी पावसाळापूर्व कामांमध्ये नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे कामाचा समावेश असतो. यंदा मात्र पावसाळा सुरू होण्यास जेमतेम १५ दिवस शिल्लक असताना हे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे नगर परिषदेला नदीपात्र सफाईचा विसर पडला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)या वर्षी पावसाचे सरासरी प्रमाण जास्त असल्याचा अंदाज जर खरा ठरला व पर्जन्यमान वाढले, तर पहिल्याच पावसात लोणावळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीपात्राची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे पसरून परिसर जलमय होईल. याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. नदीपात्राला कन्याशाळेसमोर उद्यानाच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. कैलासनगर स्मशानभूमीच्या बाजूनेदेखील भिंत बांधण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील जलपर्णी व गाळ काढण्यासोबत रेल्वेच्या मोऱ्या नगर परिषदेने साफ कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.