शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

...तर अप्रत्यक्ष भार ग्राहकांवरच

By admin | Updated: April 3, 2017 01:17 IST

वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इतर सर्व कर संपुष्टात येतील.

पुणे : वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इतर सर्व कर संपुष्टात येतील. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना जो फायदा होईल, तो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याबाबत कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे कठीण असल्याने ही तरतूद दिखाऊ स्वरूपाची वाटते. तसेच जीएसटीमुळे तोटा झालेल्या राज्यांना केंद्र सरकार पाच वर्षे परतावा देणार आहे. मात्र, त्याची वसुली अप्रत्यक्षपणे ग्राहकांकडूनच होऊ शकते, असे मत ज्येष्ठ कर सल्लागार अ‍ॅड. गोविंदराव पटवर्धन यांनी रविवारी व्यक्त केले.सजग नागरिक मंचच्या वतीने आयोजित ‘जीएसटी आणि ग्राहक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, निमंत्रक जुगल राठी आदी उपस्थित होते. अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, ‘‘सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. प्रत्यक्ष कर तर भरावेच लागतात. पण विविध अप्रत्यक्ष करही ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केले जातात. लोकांना कर कसे वसूल केले जातात याची जाणीव नाही. त्यामुळे वाढीव किमतीची वस्तू ग्राहकांना खरेदी करावी लागते. जीएसटीमुळे हे सर्व कर रद्द होतील. केंद्राने त्यासाठी चार कायदे केले आहेत. कॉम्पेन्सेशन सेस जीएसटी हा एक कायदा आहे. यामध्ये राज्यांना नुकसानभरपाई करताना वस्तूंवर सेस लावून ग्राहकांकडून वसुली केली जाणार आहे.’’जीएसटीमुळे अधिक कर असलेल्या वस्तूंचे कर कमी होण्याची तर कर नसलेल्या वस्तूंचे कर वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत व्यापाऱ्यांना जो अतिरिक्त फायदा होईल, तो त्यांनी वस्तूंच्या किमती कमी करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. कायद्यातील या तरतुदीची अंमलबजावणी खूप अवघड आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होणारच नाही. वस्तूंवरील ‘एमआरपी’तूनही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. ती रद्द करणे आवश्यक आहे. सर्व राज्यांत सारखीच करप्रणाली होणार असल्याने काही वस्तूंचे भाव वाढतील, काही वस्तूंचे कमी होतील. जीएसटी कर दर ठरविताना ते साधारणपणे सध्याच्या वस्तूच्या किमतीएवढेच असतील, असे दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.